Thursday, February 18, 2016

सरपंच महापरिषद २०१६ - वक्ते परिचय



१) के. बी. पाटील, उपाध्यक्ष, (उतीसंवर्धन, विपनन व कृषी सेवा), जैन इरिगेशन सिस्टिम्स लि.
- गेल्या २० वर्षापासून जैन इरिगेशनमध्ये कार्यरत, उल्लेखनिय कामगिरीचा चढता आलेख.
- केळी, डाळींब आदी पिकांचे उतीसंवर्धित तंत्रज्ञान विकास व प्रसारात मोलाचे योगदान
- डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे उद्यानविद्या शाखेचे पदव्युत्तर पदवीधर.
- उच्च तंत्रज्ञानाधारित फलोत्पादन, केळी उत्पादन व निर्यात या विषयातील तज्ज्ञ
- प्रकल्प आखणी, अंमलबजावणी, व्यवस्थापन यावर प्रभुत्व
- राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील अनेक संस्था व समित्यांचे सदस्य
- आंतरराष्ट्रीय पातळीवरील अनेक परिषदांमध्ये सहभाग, अनेक देशांना भेटी, प्रशिक्षण
- राज्य व राष्ट्रीय पातळीवरील अनेक पुरस्कारांनी सन्मानित

२) नाथराव कराड, इंजेगाव, बीड
- मराठवाड्यात गटशेतीची चळवळ रुजविण्यात, बळकट करण्यात व त्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या जिवनात चांगला बदल घडविण्यात मोलाची कामगिरी.
- यांच्यापासून प्रेरणा घेवून राज्यात अनेक ठिकाणी शेतकरी गट चळवळ यशस्वी झाली. शेतकरी गटांच्या माध्यमातून कृषी विकासासाठी राज्यभर मार्गदर्शन.
- राज्य शासनामार्फत गट शेतीतून कृषी विकासासाठी केलेल्या कार्याबद्दल पुरस्कार देवून गौरव.

३) एकनाथ डवले, विभागिय आयुक्त, नाशिक
- लातुरचे जिल्हाधिकारी म्हणून अनेक नाविन्यपुर्ण उपक्रम राबवले ज्यामुळे ते शेतकऱ्यांच्या गळ्यातला ताईत झाले.
- लोकसहभागातून पानंद रस्ते तयार करण्याचा त्यांचा उपक्रम प्रचंड यशस्वी, शासनाचा एक रुपयाही खर्च न करता रस्ते विकास.
- धरण, तलाव, पाणीसाठ्यातील गाळ शेतकऱ्यांसाठी विनामुल्य उपलब्ध, यातून जमिन सुपिकीकरणाबरोबरच जलसाठ्यांमध्ये प्रचंड वाढ
- राज्याचे पशुसंवर्धन आयुक्त म्हणून उल्लेखनिय कार्य, हा विभाग लोकाभिमुख करण्याचे, त्याची मरगळ झटण्याचे श्रेय श्री. डवले यांना जाते.
- सध्या नाशिक विभागाचे विभागिय आयुक्त म्हणून प्रभावी कामगिरी. प्रसंगी स्वतः ग्राऊंड लेवलला उतरुन अधिकारी, नागरिकांना प्रोत्साहन.
- उत्कृष्ट प्रशासकीय अधिकारी म्हणून उंचावता आलेख व लौकिक. अष्टपैलू व्यक्तिमत्व. शेतकरी व ग्रामविकास हे अतिशय जिव्हाळ्याचे विषय.

४) शैलेश नवाल
- भारतीय प्रशासन सेवेतील नव्या दमाचे तरुण तडफदार अधिकारी, नगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ)
- ग्रामिण राजकीय दृष्ट्या संपन्न गुंतागुंतीच्या, वादविवादांच्या पार्श्वभूमीवर नवाल यांनी नगर जिह्यातील ग्रामविकासाला गट, तट, राजकारणाच्या पलिकडे गती देण्यासाठी महत्वपूर्ण पावले उचलली आहेत.
- शाळांचे इ लर्निंग, शिक्षण, पाणी, शेती सुधारणेच्या माध्यमातून ग्रामविकासासाठी महत्वपूर्ण योगदान आहे.

५) कल्पिता पाटील, सरपंच, कल्याणहोळ, जळगाव
- ग्रामविकासासाठी लोकसहभागातू अनेक महत्वपूर्ण, नाविन्यपुर्ण उपक्रम राबवले आहेत.
- टीव्हीबंद अभियान- आठवड्यातून एक दिवस गावात टीव्ही बंद ठेवतात.
- जिल्हाभरात कायदेविषयक शिबिरे, दारुबंदीसाठी प्रभावी काम
- राष्‍ट्रवादी युवती कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्ष म्हणून महिला जागृतीसाठी विशेष कार्य

६) चंदू पाटील मारकवार, सरपंच, राजगड, ता. मुल, जि. चंद्रपूर
- सरपंच पदाची ही चौथी टर्म
- संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात २००२-०३ मध्ये राज्यात प्रथम क्रमांक
- राष्ट्रपतींच्या हस्ते २००६ साली निर्मलग्राम पुरस्कार व २०११ मध्ये पर्यवरण विकासरत्न पुरस्कार
- २००८ मध्ये महात्मा गांधी तंटामुक्त पुरस्कार, चार हजार मिटर लांबीची गटारे गावकरी स्वच्छ करतात.
- पंधरा वर्षापासून गावात सातत्यपूर्ण विकास, श्रमदानातून पाणलोट, गाळ उपसा आदी अनेक कामे.

७) प्रभाकर देशमुख, जलसंधारण सचिव, महाराष्ट्र राज्य
- ज्याच्या जलयुक्त शिवार अभियानाची धुरा समर्थपणे सांभाळत आहेत. हे अभियानही त्यांच्याच कल्पनेचे मुर्त स्वरुप आहे.
- बारामतीचे प्रांत म्हणून शासकीय सेवेची सुरवात, त्यानंतर अनेक ठिकाणी, अनेक पदांवर उल्लेखनिय कार्य
- कोल्हापूर जिल्हा परिषदेचे सीईओ म्हणून केलेल्या कार्याबद्दल राष्ट्रपती सन्मान
- पुण्याचे जिल्हाधिकारी म्हणून उल्लेखनिय कामगिरी, अनेक उपक्रमांची राज्यभर अंमलबजावणी
- राज्याचे कृषी आयुक्त म्हणून उत्कृष्ट कामगिरी, अनेक पुरस्कारांनी सन्मानित
- कृषीग्रामविकास व कडधान्य उत्पादनवाढील महत्वपूर्ण योगदान, स्वतःचे सातारा लोधवडे गाव आदर्श गाव करण्याकडे वाटचाल.
- कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांना ग्रामसभेस उपस्थित राहणे बंधनकारक केले. कृषी सेवकांची ग्रामपंचायतीशी जोडणी केली. हे निर्णय सरपंच परिषदेत सरपंचांनी केलेल्या मागणीनुसार घेण्यात आले.

८) डॉ. अविनाश पोळ
- व्यवसायाने दंतचिकित्सक, पण त्यापलिकडे जावून सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून ग्रामिण आरोग्य, रस्ते, जलसंधारण, स्वच्छता आदी क्षेत्रात महत्वपूर्ण कामगिरी.
- गावे हागनदारीमुक्त करण्यासाठी राज्यभरात 700 ग्रामसभा घेतल्या. कामाचे एनजीओकरण होऊ दिले नाही.
- सातारा जिल्ह्यात जलसंधारणविषयक भरिव काम, यामुळे अनेक गावांच्या भुजल पातळीत लक्षणिय वाढ.
- त्यांच्यापासून प्रेरणा घेवून अनेक व्यक्तींकडून जलसंधारण व ग्रामिण विकासात योगदान

९) नरहरी शिवपुजे
- १९९५ पासून पुर्णवेळ सामाजिक कार्यकर्ते, सर्वकष ग्रामविकासासाठी पाणी या विशयात विशेष कार्य
- औरंगाबाद, नाशिक, लातुर, हिंगोली आदी जिल्ह्यांमध्ये पाणलोट विकास, पाणी पुरवठा, व्यवस्थापन या क्षेत्रात मोठे कार्य
- ५० हून अधिक गावांचे तांत्रिक सल्लागार म्हणून उल्लेखनिय कार्य, गावांना विकासाचा मार्ग आखून देणारा माणूस.
- पाणी या विषयावर वृत्तपत्र, पुस्तकांतून विपूल लेखन, आकाशवाणी, दुरदर्शनवरुनही जलसाक्षरतेसाठी कार्य

१०) बी. बी. ठोंबरे, अध्यक्ष, नॅचरल शुगर्स लि.
- मराठवाड्याच्या दुष्काळग्रस्त भागात नॅचरल शुगर्स लि. हा खासगी साखर उद्योग उभारुन हजारो शेतकऱ्यांना शाश्वत प्रगतीचा मार्ग खुला केला
- साखर कारखाना कसा चालवावा, याबाबत आदर्श उभा केला. अनेक बाबतीत इनोव्हेशन्स घडवली. शेतकऱ्यांना सर्वोत्तम सेवा देण्याचा प्रयत्न
- महाराष्ट्र शासनामार्फत त्यांच्या कृषी क्षेत्रातील कार्याचा राज्यातील सर्वोच्च कृषीरत्न पुरस्कार देवून गौरव.

११) विलास विष्णू शिंदे, नाशिक
- कृषी अभियांत्रिकीत उच्च शिक्षण घेतल्यानंतर आधी स्वतःच्या शेतीचा विकास केला.
- डेअरी, त्यानंतर पॅकहाऊस, कोल्डस्टोरेज उभारून 2004 पासून द्राक्ष निर्यात सुरु केली. पहिल्याच वर्षी 4 कंटेनर निर्यात.
- 2008-09 पर्यंत भारतातील सर्वात मोठा शेतकरी निर्यातदार म्हणून मजल.
- 2014-15 चा द्राक्ष निर्यातीची उलाढाल 102 कोटी रुपये, 2000 कुटुंबांना रोजगार
- शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन केली, फळे भाजीपाला प्रक्रीया (सह्याद्री फार्मर प्रड्युसर कंपनी लि.)

१२) महेश शेळके, नारायणगाव, पुणे
- व्यवस्थापकीय संचालक, कृषीजिवन फार्मर्स प्रड्युसर कंपनी, नारायणगाव, जुन्नर, पुणे
- दिल्लीत थेट ग्राहकांना कांदा पुरवठा करणारी राज्यातील पहिली उत्पादक कंपनी.
- पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपमधून टोमॅटो, भाजीपाला उत्पादनासाठी प्रकल्प राबवणारी राज्यातील पहिली उत्पादक कंपनी
- कांदा बिजोत्पादन, निविष्ठांचा ना नफा ना तोटा पुरवठा आदी नाविन्यपुर्ण उपक्रमांतून सभासद शेतकऱ्यांना मोठा लाभ मिळवून देत आहेत.
- कंपनीच्या सभासद शेतकऱ्यांच्या शेतमालाची थेट ग्राहकांना विक्री करण्यासाठीची पुरवठा साखळी उभारली. यशस्वी अंमलबजावणी.

१३) मारुती चापके, मुंबई
- व्यवस्थापकीय संचालक, गो फॉर फ्रेश प्रा. लि. मुंबई, थेट ग्राहकांना ऑनलाईन शेतमाल विक्री करणारी संस्था
- पुणे कृषीमहाविद्यालयाचे विद्यार्थी, मॅनेज हैद्राबादमधून पदव्युत्तर शिक्षण, महेंद्रा शुभलाभ, किशोर बियाणी कंपन्यामध्ये उच्चपदावर काम.
- गेल्या कांदा हंगामात दिल्ली सरकारला २५ कोटी रुपयांचा कांदा खरेदी करुन दिला.
- टाटाने त्यांना फळे व भाजीपाल्याच्या व्हॅल्यू ॲडिशन आणि ब्रॅन्डिंग साठी २०० कोटी रुपयांचे अर्थसहाय्य देवू केले आहे.

१४) पाशा पटेल, माजी आमदार, लातूर
- शरद जोशींच्या शेतकरी संघटनेतून कामाला सुरवात. जोशींच्या सल्ल्यानुसार भाजपमध्ये प्रवेश, भाजपमार्फत आमदार.
- गेली दोन वर्षे शेतकरी चळवळीचे आघाडीचे कार्यकर्ते, नेते. सत्तेत व विरोधात असतानाही शेतकऱ्यांसाठी अनेक आंदोलने, मोर्चे, जागृती कार्यक्रम
- कृषी मुल्य आयोगाचे अध्यक्ष व अधिकाऱ्यांना राज्यातील शेतात फिरवून वस्तुस्थिती दाखवून दिली.
- कृषी मुल्य आयोगाची सिस्टिम सुधारण्यात, मालाला योग्य दर मिळवून देण्यात, राज्यस्तरीय समितीच्या निर्मितीत मोलाचे योगदान
- शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी लातूरमध्ये कृषी शिक्षण संकुलाची स्थापना, कृषी अर्थशास्त्रावर सर्वाधिक भर
- मराठवाड्यातील पाणलोट विकास, जलसंधारण, ओढे-नाले खोलीकरण रुंदीकरणाच्या माध्यमातून पाणी चळवळीत मोलाचे योगदान

१५) विकास देशमुख, कृषी आयुक्त महाराष्ट्र राज्य
- राज्याचे कृषी आयुक्त म्हणून गेल्या वर्षापासून उत्कृष्ट कामगिरी, स्वतः कृषी शाखेचे पदव्युत्तर पदवीधर
- कृषी विभागाच्या विविध योजनांच्या प्रभावी नियोजन व अंमलबजावणीतून कृषीकेंद्रीत ग्रामविकासाला पाठबळ
- त्यापुर्वी सातारा, पुण्याचे जिल्हाधिकारी म्हणूनही उत्कृष्ट कारकिर्द, पुण्याच्या सर्वांगिण विकासात मोलाचा वाटा
- देशमुख सरांनी जिल्हास्तरावर राबविलेल्या अनेक प्रकल्पांची राज्यस्तरावर अंमलबजावणी.

१६) पोपटराव पवार
- १९८९ पासून नगर जिल्यातील दुष्काळग्रस्त पारनेर तालुक्यातील हिवरे बाजार गावचे सरपंच
- ग्रामस्थांना एकजुट करुन हिवरेबाजारचा एकहाती कायापालट केला. आदर्श गाव म्हणून जगभर ख्याती.
- २० लाखाहून अधिक लोकांनी भेट देवून हिवरे बाजार मॉडेलची पहाणी केली, त्यापासून ग्रामविकासाची प्रेरणा घेतली.
- राज्यात आदर्श गावे तयार करण्यासाच्या आदर्श गाव संकल्प व प्रकल्प समितीचे कार्याध्यक्ष, राज्यमंत्रीपद दर्जा
- आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व, राज्य व राष्ट्रीय पातळीवरील अनेक संस्था, समित्यांचे सदस्य
- राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील सुमारे ३५ हून अधिक पुरस्कारांनी सन्मानित.
- राज्यात, केंद्रात सरकार कोणाचेही असो... सरपंचांच्या मनात एकच उद्दीष्ट असते... पोपटराव पवारांसारखे सरपंच व्हायचे, त्यांच्यासारखे आपलेही गाव विकसित करायचे.
---------------------------------(समाप्त)------------------------------ 

No comments:

Post a Comment