Tuesday, February 16, 2016

सरपंच महापरिषद - मुख्यमंत्र्यांसाठी नोट

मा. मुख्यमंत्री महोदयांच्या माहितीसाठी...
----------
ॲग्रोवन
- २० एप्रिल २००५ रोजी ॲग्रोवनचा प्रारंभ झाला. जगातले एकमेव कृषी दैनिक. पहिल्या दिवसांपासून राज्यातील शेती व शेतकऱ्यांच्या विकासासाठी उल्लेखनिय प्रयत्न काम.
- गेल्या १० वर्षात ॲग्रोवनपासून माहिती व प्रेरणा घेवून राज्यातील हजारो शेतकरी कृषी विकासाच्या मुख्य प्रवाहात आले. यशस्वी झाले. कृतज्ञता म्हणून अनेकांनी आपल्या घरांना, शेताला ॲग्रोवन नाव दिले.
- वैयक्तिक शेतकऱ्यांच्या व शेतकरी समुहांच्या, गटांच्या जिवनात मोठा बदल घडवण्यात, त्यांचे अर्थिक घडी बसविण्यात ॲग्रोवनची मोलाची कामगिरी.

सरपंच
- सरपंच हा गावचा प्रमुख. तो सुशिक्षित आणि प्रशिक्षित असेल तर गावाच्या विकासाला वेळ लागत नाही. राज्यातील अनेक सरपंचांनी आपल्या कामातून आपापल्या गावांचे भाग्य बदलले आहे.
- मात्र अद्यापही राज्यातील हजारो गावांना नेतृत्व प्रशिक्षित, विकासाभिमुख नसल्याचा फटका सहन करावा लागतोय. शाळा दुरुस्ती, पाणी योजना, हागणदारी आणि तंटामुक्त म्हणजे विकसित गाव अशा समज.
- राज्यातील बहुतेक गावांची इकॉनॉमी शेतीवर आधारीत. शेती हाच गावांच्या विकासाचा कणा आहे. मात्र सरपंचांकडून त्याकडे दुर्लक्ष. परिणामी अशा गावांमध्ये शेती व शेतकऱ्यांच्या विकासाची गती कमी.
- शेतकऱ्यांच्या वैयक्तिक धडपडीला गावाचे, ग्रामपंचायतीचे बळ मिळाले तर विकासाची गती व बदलांचा आवाका प्रचंड वाढतो... हे राज्यातील अनेक उदाहरणांनी स्पष्ट.

ॲग्रोवन सरपंच महापरिषद... प्रारंभ व वाटचाल...
- गावांच्या कृषीकेंद्रीत विकासाला चालना देण्याच्या उद्देशाने सकाळ माध्यम समुहामार्फत २०१२ पासून ॲग्रोवन सरपंच महापरिषद उपक्रम सुरु करणात आला.
- पहिली सरपंच महापरिषद मराठवाड्यात औरंगाबाद येथे घेण्यात आली. राज्यभरातील १००० सरपंच या परिषदेस उपस्थित होते.
- यानंतर नाशिक, कोल्हापूर, जळगाव या ठिकाणी सरपंच महापरिषदा पार पडल्या. राज्यभरातील सरपंचांचा त्यास प्रचंड मोठा प्रतिसाद मिळाला. आत्तापर्यंत पाच हजार सरपंचांना प्रशिक्षण दिलेय.
- ॲग्रोवनची सरपंच महापरिषद हा सद्यस्थितीत सरपंचांना ग्रामविकासाचा मुलमंत्र देणारा राज्यातील सर्वात मोठा सोहळा आहे. त्यात सहभागी होण्यासाठी राज्यभरातील सरपंचांत प्रचंड चुरस असते.

सरपंच महापरिषदेत काय...
- परिषदेत सहभागी होण्यासाठी सकाळच्या राज्यभरातील बातमीदारांमार्फत राज्यातील २८ हजार सरपंचांमधून उच्चशिक्षित, विकासाभिमुख, तरुण १००० महिला व पुरुष सरपंचांची निवड केली जाते.
- सलग दोन दिवस ग्रामविकास मंत्री, आदर्श सरपंच, कृषी उद्योजक, ग्रामविकास तज्ञ आदीमार्फत सरपंचांना मार्गदर्शन.
- ग्रामिण व शेती व्यवसायासंबंधी कृषीकेंद्रीत अर्थव्यवस्था निर्माण करण्याच्या अनुषंगाने प्रशिक्षणात भर दिला जातो.
- सरपंचांची निवास, भोजन व्यवस्था ॲग्रोवनमार्फत केली जाते. सहभागी सरपंचांकडून कोणताही प्रकारचे शुल्क आकारण्यात येत नाही.

महापरिषदेचा परिणाम
- गावात सहज पद्धतीने अमलबजावणी करता येईल अशा पद्धतीनेमार्गदर्शन मिळाल्याने अनेक गावात सरपंचांनी लक्षणीय बदल घडवून आणले.
- जलसंधारण, गटशेती, शेतीचे नवतंत्रज्ञान, शेतकऱ्यांच्या कंपन्या आदी माध्यमातून गावांच्या विकासाला गती देण्यात या सरपंचांचा मोलाचा वाटा
- प्रशिक्षित सरपंचांमुळे सरकारच्या योजनांची उद्दीष्टपुर्ती होण्यास मोठी मदत, जलयुक्त शिवार व इतर योजनांची या सरपंचांकडून प्रभावी अंमलबजावणी.
- प्रभावी कामामुळे यातील अनेक सरपंचांची गावामार्फत बहुमताने सरपंच पदी फेरनिवड.

-----------------------------

सरपंच महापरिषदेत पुढील मुद्यांवर भाष्य अपेक्षीत...

१) ग्रामविकासाबाबत राज्य सरकारची भुमिका, नवी दिशा इ. सरपंचांकडूनची अपेक्षा
२) जलयुक्त शिवार, सरपंचांची भुमिका व लोकसहभाग
३) कृषीकेंद्रीत अर्थव्यवस्थेवर सरपंचांनी भर द्यावा.
४) स्मार्ट शहरांबरोबरच स्मार्ट खेडी कशी होतील यासाठी सरपंचांनी कंपनीच्या सीईओ प्रमाणे गावात काम करावे.
५) १४ वा वित्त आयोगातून मिळणारा निधी, वितरण, विनियोग व सरपंचांकडूनच्या अपेक्षा. गावांचे भविष्य घडविण्याची संधी.
६) दुष्काळी स्थितीत सरपंचाकडून असलेल्या अपेक्षा, ढासळते पर्यावरण, वृक्षलागवडीची गरज, आगामी पिढ्यांसाठीचे नियोजन
७) विकासाचे राजकारणावर भर - सरपंच गावाचा... पक्षाचा नाही. संपूर्ण गावाच्या सर्वसमावेशक विकासावर भर द्यावा
८) राज्यातील उच्चशिक्षित तरुणांनी गावाच्या विकासाची धुरा खांद्यावर घ्यावी.
९) ॲग्रोवन सरपंच महापरिषद हा राज्याच्या कयसरपंचांसाठीचा प्रशिक्षण कार्यक्रम उल्लेखनिय
१०) सरपंचांनी विकासाची बेटं तयार केली तर शहरांवरील ताण कमी होईल. सरपचांनी गावातच रोजगार उपलब्ध करावा.
-------------------



No comments:

Post a Comment