पुणे (प्रतिनिधी) - येत्या आर्थिक वर्षात (२०१६-१७) राज्यात सार्वजनिक
खासगी गुंतवणूकीतून (पीपीपी) एकात्मिक कृषी विकासाचे प्रकल्प राबविण्यासाठी
प्रस्ताव सादर करण्याची अंतिम मुदत २५ डिसेंबर २०१५ ही आहे. राज्यातील
कोणत्याही जिल्ह्यांमध्ये असे प्रकल्प राबविण्यास इच्छूक असलेल्या खासगी
कंपन्या, संस्था, शेतकरी उत्पादक कंपन्या यांनी आपले प्रस्ताव अंतिम मुदतीत
कृषी आयुक्तालयातील नियोजन शाखेत जमा करावेत, असे आवाहन कृषी आयुक्त विकास
देशमुख यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी कृषी विभागाच्या mahaagri.gov.in
या संकेतस्थळास भेट द्यावी.
No comments:
Post a Comment