Wednesday, October 28, 2015

कृषी आणि पणन, फलोत्पादन - राज्य वार्षिक मुल्यांकन

डॉ. व्यंकट मायंदे, माजी कुलगुरु, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला
-------------------------------
अ) गतवर्षभरात खात्याबाबत झालेले पाच चांगले निर्णय
१) जलयुक्त शिवार कार्यक्रमातून २४ टीएमसी साठा निर्माण केला.
२) कृषी निविष्ठांचे अनुदान थेट खात्यावर जमा करण्याचा निर्णय.
३) राज्य कृषी मुल्य आयोगाची स्थापना
४) कृषी क्षेत्राच्या स्थैऱ्यासाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्याचा निर्णय.
५) कृषी शिक्षणाच्या विस्ताराचा निर्णय. नवीन विद्यापीठे, महाविद्यालयांची स्थापना
-------------------
ब) गतवर्षभरात खात्याबाबतचे पाच फसलेले निर्णय
१) केंद्र पुरस्कृत योजना व अनुदान यात झालेली मोठी घट
२) कृषी क्षेत्रात पायाभूत सुविधा करण्याचा निर्णय कागदावरच
३) कृषी क्षेत्रातील आर्थिक वाढीचा दर उंचावण्यात अपयश
४) कृषी अवजारे व निविष्ठा वाटपातील भ्रष्टाचार थांबविण्यात अपयश.
५) शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविण्यात अपयश.
------------------
क) आगामी काळात खात्याबाबत अपेक्षित पाच प्रमुख निर्णय किंवा उचलावयाची पावले
१) कृषी क्षेत्राच्या वाढीसाठी इतर राज्यांच्या धर्तीवर कृषी व संलग्न खात्यांचा वेगळा अर्थसंकल्प हवा.
२) बाजार समिती कायद्यात सुधारणा करुन शेतकऱ्यांची बाजार साक्षरता (मार्केट इंटेलिजन्स) वाढविण्यावर भर द्यावा.
३) प्रत्येक जिल्ह्यात तेथील मुख्य पिकांवर आधारीत शेतमाल मुल्यवर्धन साखळीसाठी मेगा फुड पार्क स्थापन करावेत.
४) जमीन आरोग्याच्या दृष्टीने शेतीसाठी गुणवत्तापूर्ण जैविक व सेंद्रीय निविष्ठांच्या पुरवठ्याची व्यवस्था करावी.
५) शेतकऱ्यांना सामाजिक सुरक्षाकवच देण्यासाठी पिक विमा, पशु विमा आदी जनांचे बळकटीकरण करावे.
--------------
ड) खात्याची वर्षभरातील कामगिरीचे मुल्यमापन
(१ ते १० गुण द्यावेत. १ गुण निचांकी कामगिरी तर १० गुण सर्वोत्कृष्ट कामगिरी दर्शवणारा असेल)

- ३ गुण
--------------- 

No comments:

Post a Comment