Tuesday, February 25, 2014

राज्यभर पावसाचे सावट गडद

पुणे (प्रतिनिधी) ः बाष्पयुक्त ढगांच्या प्रमाणात हवामानात मोठी वाढ झाल्याने कोकण व्यतिरिक्तच्या संपूर्ण महाराष्ट्रावर पावसाचे सावट गडद झाले आहे. हवामान खात्याने रविवारी (ता.23) सकाळपर्यंत मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. पाऊस झाल्यास काढणीस आलेल्या रब्बी पिकांबरोबरच द्राक्ष व इतर पिकांनाही नुकसानीचा धोका आहे. 

हिंदी महासागर व अरबी समुद्रातील चक्राकार वारे, कमी दाबाचे पट्टे व उत्तरेत राजस्थान व हिमालयाच्या पायथ्याकडील भागातील कमी दाबाची स्थिती यामुळे देशात अनेक राज्यांमध्ये ढगाळ हवामानात मोठी वाढ झाली आहे. यामुळे हिमालयीन भाग, मध्य व दक्षिण भारतातील राज्यांवर पावसाचे सावट आहे. मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याच्या तुलनेत विदर्भात पावसाचे सावट अधिक काळ राहण्याचा अंदाज आहे. 

शुक्रवारी सकाळपर्यंतच्या चोवीस तासात विदर्भात किमान तापमानात लक्षणीय घट झाली. अनेक ठिकाणी किमान तापमानाचा पारा सरासरीहून दोन ते पाच अंशांनी घसरला. याउलट मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात किमान तापमानात सरासरीहून दोन ते पाच अंश सेल्सिअसने वाढ झाली. कोकणात किमान तापमान सरासरीच्या जवळपास होते. दिवसभरात गोंदिया येथे राज्यातील सर्वांत कमी 13.3 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. 

शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या 24 तासातील किमान तापमान अंश सेल्सिअसमध्ये ः मुंबई 23.2, रत्नागिरी 22.8, पणजी 22.3, डहाणू 20.6, भिरा 21.5, पुणे 18.6, नगर 20.5, जळगाव 14.8, कोल्हापूर 20.4, महाबळेश्‍वर 15.7, मालेगाव 18.3, नाशिक 16.6, सांगली 20.5, सातारा 18, सोलापूर 23.1, उस्मानाबाद 18.9, औरंगाबाद 20.5, परभणी 18.2, नांदेड 14, बीड 20.6, अकोला 20.6, अमरावती 15.2, बुलडाणा 19, ब्रम्हपुरी 16.7, चंद्रपूर 20.8, गोंदिया 13.6, नागपूर 14.1, वाशीम 18, वर्धा 15.8, यवतमाळ 17 
-------------- 

No comments:

Post a Comment