पुणे ः येथिल ऍक्शन फॉर
ऍग्रिकल्चर रिन्युअल इन महाराष्ट्र (अफार्म) या संस्थेला विदर्भातील कोरडवाहू
अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या उपजिविका सक्षमीकरणासाठी केलेल्या अभिनव कार्याबद्दल
राज्य शासनामार्फत केंद्रीय ग्रामविकासमंत्री जयराम रमेश यांच्या हस्ते "ग्रामीण
उपजीविका क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट नवोपक्रम पुरस्कार' देवून गौरविण्यात आले.
रविद्र नाट्यमंदीर (मुंबई) या ठिकाणी झालेल्या समारंभात नुकताच हा पुरस्कार प्रदान
करण्यात आला.
ग्रामविकासमंत्री जयंत पाटील, राज्यमंत्री सतेज पाटील, जागतीक बॅंक प्रतिनिधी परमेश शहा, केंद्रीय ग्रामीण विकास सचिव विजयकुमार, प्रधान सचिव एस. एस. सिंधू आदी यावेळी उपस्थित होते. अफार्मचे कार्यकारी संचालक सुभाष तांबोळी यांनी हा पुरस्कार स्विकारला. पाच लाख रुपये, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. अफार्ममार्फत गेल्या सहा वर्षापासून अमरावती व यवतमाळ जिल्ह्यातील 39 गावांतील पाच हजार 900 शेतकरी कुटुंबांना वैफल्यग्रस्त स्थितीतून बाहेर काढण्यासाठी एकात्मिक कृती कार्यक्रम राबविण्यात येत आहे.
-----------
ग्रामविकासमंत्री जयंत पाटील, राज्यमंत्री सतेज पाटील, जागतीक बॅंक प्रतिनिधी परमेश शहा, केंद्रीय ग्रामीण विकास सचिव विजयकुमार, प्रधान सचिव एस. एस. सिंधू आदी यावेळी उपस्थित होते. अफार्मचे कार्यकारी संचालक सुभाष तांबोळी यांनी हा पुरस्कार स्विकारला. पाच लाख रुपये, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. अफार्ममार्फत गेल्या सहा वर्षापासून अमरावती व यवतमाळ जिल्ह्यातील 39 गावांतील पाच हजार 900 शेतकरी कुटुंबांना वैफल्यग्रस्त स्थितीतून बाहेर काढण्यासाठी एकात्मिक कृती कार्यक्रम राबविण्यात येत आहे.
-----------
No comments:
Post a Comment