Tuesday, March 15, 2016

काश्मिर ते कन्याकुमारी... एक सायकल प्रवास

जगणं समृद्ध करणारा रोमांचक प्रवास
-----------------------
महात्मा गांधी, स्वामी विकेकानंद आदी जग बदलणाऱ्या, लाखो लोकांच्या जिवनावर, जिवनपद्धतीवर प्रभाव पाडणाऱ्या मोठ्या लोकांमध्ये एक गोष्ट समान दिसते. त्यांनी आपापला देश सर्वप्रथम समजून घेतला. त्यासाठी ते देशभर फिरले. माती, माणसं, प्रदेश, रुढी, परंपरा, मानसिकता, जिवनपद्धती, सुख, दुःख, वारसा, वाटचाल, दृष्टीकोन, अपेक्षा हे सारं काही समजून घेतलं. आपापल्या कार्यक्षेत्राशी नाळ जोडली, एकरुप झाले. अनुभूतीतून आलेली समज, ज्ञानाच्या जोरावर पुढे इतिहास घडवला. माणसाच्या वैयक्तिक जडणघडणीत प्रवासाचा, त्यातून होणाऱ्या आकलनाचा, आत्माभुतीचा फार मोठा वाटा असतो. हे वैश्विक सुत्र समजून घेतले तर जयदिप शिंदे व संकेत देशमुख या पुण्यातील सिंहगड कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी सायकलवर केलेल्या काश्मिर ते कन्याकुमारी या सायकल टूर चे महत्व अधिकच अधोरेखित होते. त्यांच्या २७ दिवसाच्या प्रेरणादायी मोहिमेचे त्यांच्याच शब्दात राहूल रायकर यांनी काश्मिर ते कन्याकुमारी... एक सायकल प्रवास या पुस्तकात शब्दबद्ध केले आहे. पुण्यातील स्नेहल प्रकाशन ने ते प्रसिद्ध केले आहे. आवर्जून वाचावं असे हे पुस्तक आहे...

- दहा वर्षे सायकलला हात लागला नसताना अचानक शाळेतल्या मित्रांनी पुणे ते महाबळेश्वर सायकल टूर ठरवली. भाड्याच्या सायकली घेवून निघाले पण पोचता पोचता तोंडाला फेस आला. दमलेल्या अवस्थेत एकानं पैज लावली... काश्मिर ते कन्याकुमारी सायकलवर करिल त्याला पार्टी वगैरे.
- संकेत व जयदिप ने हे चॅलेंज स्विकारले आणि अतिशय थोड्या वेळात मोहीम आखली. तयारी म्हणजे काय... तर फक्त प्रवासाचा मार्ग व मुक्कामाची ठिकाणं ठरलेली. बाकी सारं नाविन्यच. येईल तो अनुभव घ्यायचा आणि चालत रहायचं हे सुत्र. जोडीला शाळांमध्ये विद्यार्थ्यांशी संवाद साधून पर्यावरणविषयक जागृतीचाही अजेंडा हाती घेतला व राबवला.
- कोषातून बाहेर पडल्यानंतर प्रत्येक्ष क्षण नवा अनुभव देत होता. मंदीरं, शाळा, ढाबे, माणसं... त्या त्या भागाशी एकरुप होत मनाची, शरिराची क्षमता वाढवत मुक्त पाखरासारखा प्रवास.
- वाऱ्याची दिशा, रस्त्यावरील पांढऱ्या रंगाचे पट्टे यांचा सायकल चालवताना झालेल्या फायदा आणि ट्रेक, ट्रॅक्टरची साखळी धरुन जानाचा तोटा, अपघात काहीही आडपडदा न ठेवता सर्व अनुभवांचे संचित दिलखुलासपणे खुले केले आहे.
- एका दिवशी ६० ते ३०४ किलोमिटरपर्यंत प्रवास. सलग ३१ दिवसांची मोहीम २७ दिवसात पूर्ण केली. उद्दीष्ट ठरवणं आणि ते वेळेआधी पुर्ण करण्याची नशा, जिद्द, जिगर एकमेकाद्वितीय. स्वतःला उद्दीष्ट गाठण्याची, जिकण्याची सवय कशी लावावी, याचा उत्तम वस्तूपाठ.
- साहसी प्रवास, त्यातून येणारी अनुभूती, गाठीशी बांधला जाणारा अनुभव, त्यातून मिळणाऱ्या टिप्स... या सर्वातून प्रगल्भ होत जाणारं व्यक्तीमत्व हे सारं या पुस्तकात पहायला मिळतं.
-----------------------

No comments:

Post a Comment