Friday, March 18, 2016

सुनिल पवार - अर्थसंकल्प प्रतिक्रिया

उपयुक्त तरतुदी
या अर्थसंकल्पाप्रमाणे संबंधित बाबींवर प्रत्यक्षात खर्च झाला, तर महाराष्ट्राच्या कृषी क्षेत्रात आतापर्यंतचे सर्वोत्तम काम या वर्षात होऊ शकते. कृषीसाठी २५ हजार कोटी ही मोठी तरतूद आहे. पीक विमा अत्यंत महत्त्वाचा आहे. फळबागांमध्ये त्याबाबत चांगले काम झाले आहे. आता विम्यासाठीची तरतूद समाधानकारक आहे. प्रक्रिया उद्योगाला यंत्रसामग्रीसाठी कमाल ५० लाख रुपयांचे अनुदान वाइन व बेदाणा उद्योगांच्या दृष्टीने उपयुक्त ठरेल. पण ते फक्त २५ टक्के आहे. ठिबक सिंचनासाठी भरिव तरतूद झाल्याने तीन वर्षांपासून रखडलेली प्रकरणे निकाली निघून फळबागांपलीकडे ऊस व इतर पिकांनाही त्याचा थेट चांगला लाभ होईल. निर्यात व पायाभूत गोष्टींसाठी कमी तरतूद आहे, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघांचे संचालक सुनील पवार यांनी दिली आहे.   

No comments:

Post a Comment