Friday, March 18, 2016

डॉ. शंकरराव मगर - अर्थसंकल्प प्रतिक्रिया

केंद्राचा अर्थसंकल्प व राज्याचा अर्थसंकल्प यात खूपच साम्य आहे. मोठ्या आशा निर्माण करायच्या आणि शेंडीला तूप लावल्यासारखी तरतूद करायची, असा प्रकार आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर ५० हजार कोटी रुपयांची तरतूद अपेक्षित होती. एकीकडे शेतकरी प्रचंड संकटात आहे. आत्महत्या वाढत आहेत. आणि एकूण अर्थसंकल्पाचा विचार करता तुटपुंजी रक्कम असूनही शेतकऱ्यांना अर्पण आणि स्वाभिमान वर्षाचे कौतुक सांगतात, ते शेतकऱ्यांना काय कामाचे. उड्डाण पूल, रस्त्यांना प्रचंड तरतूद केली आहे. शेतकऱ्यांवरील संकट पाहता एखादे वर्षे रस्त्यांची कामे थांबवून पूर्ण क्षमतेनिशी शेतकऱ्यांना पाठिंबा दिला असता, तर बिघडले असते का?

जलसिंचन प्रकल्प व जलयुक्त शिवारसाठीची तरतूद फारच कमी आहे. साठवण व प्रक्रिया या चांगल्या विषयाला हात घालता असला, तरी याविषयीच्या तरतुदीविषयी व निकषांविषयी संधिग्धता आहे. यात अन्नधान्य व कडधान्यावर जोर देणे आवश्यक आहे. विम्याची तरतूद त्या मानाने चांगली आहे. मेक इन महाराष्ट्र, स्टार्ट अप म्हणतात आणि फक्त २५ टक्के अनुदान हे कमीच आहे. मत्स्य व्यवसायातून सरकार सहा हजार कोटी रुपये कर कमावतेय आणि त्यासाठी फक्त १५० कोटी ठेवलेत. मत्स्य विद्यापीठाचा प्रस्तावही गुंडाळण्यात आलाय. सेंद्रिय शेतीसाठी बजेट ठेवलेले नाही, पण उल्लेख केला हेही चांगले झाले. ग्रामीण विभागाकडे बारिक लक्ष दिलेय ही त्यातल्या त्यात चांगली बाब आहे.
- डॉ. शंकरराव मगर, माजी कुलगुरू, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ 

No comments:

Post a Comment