साम टिव्हीवर रविवारी
ॲग्रोवन स्मार्ट पुरस्कारांचा जल्लोष पुणे (प्रतिनिधी) - महाराष्ट्राच्या कृषी व ग्रामिण संस्कृतीची झलक दाखवणाऱ्या अस्सल गावरान दिमाखदार गीत, संगीत, नृत्यमय अविष्कारात राज्यभरातील शेतकऱ्यांच्या गौरव सोहळा याची देही याची डोळा घरबसल्या अनुभवण्याची संधी राज्यभरातील शेतकऱ्यांना उपलब्ध झाली आहे. भरघोस रकमेसह शेतकऱ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकणारा हा सोहळा येत्या रविवारी (ता.१३) सायंकाळी ६.३० ते रात्री १० या वेळेत साम टिव्हीवर दाखविण्यात येणार आहे. याच दिवशी मध्यरात्री साडे बारा वाजता या कार्यक्रमाचे पुर्नप्रक्षेपण करण्यात येणार आहे. चित्रपट अभिनेत्री भार्गवी चिरमुले व नकुल घाणेकर नृत्य पथकाची एकाहून एक सरस, ठसकेबाज ग्रामिण, कृषी व लोकगितांवरील अदाकारी, अभिनेते योगेश शिरसाट व नम्रता संभेराव या जोडीची बतावणीची जुगलबंदी, हास्याचे धबधबे आणि कारुण्याची किनार आणि गायिका आर्या आंबेकर, कार्तिकी गायकवाड, रोहित राऊत यांची नादब्रम्ह जागवणारी, काळजाला हात घालणारी सुरेल मैफिल आणि त्यांना अनेक दिग्गजांची साथ अशा एकाहून एक सरस सादरीकरणांचा या सोहळ्यात समावेश आहे. बिकट परिस्थितीशी झुंजून उज्वल यश मिळवलेल्या, शेतीच्या विकासात मोलाचे योगदान देणाऱ्या राज्यातील निवडक शेतकऱ्यांना ॲग्रोवनमार्फत विविध पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. यात विलास शिंदे (नाशिक), कुसुमताई गव्हाळे (अकोला), मनीषा कुंजिर, कांतिलाल रणदिवे, रोहिदास डोके (पुणे), अभिजिक फाळके (वर्धा), मोहोम्मद गौस (परभणी), अंकुश पडवळे (सोलापूर), जगन्नाथ बोरकर (वाशीम), उद्धव खेडेकर (जालना), चैत्राम पवार (धुळे), सचिन चुरी (पालघर) या शेतकऱ्यांचा समावेश आहे. ------------------- | |||
Thursday, March 10, 2016
अॅग्रोवन पुरस्कार सोहळा सामवर
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment