Saturday, November 1, 2014

हवामानाधारित रब्बी विम्याला 15 दिवसांची मुदतवाढ

गहू, हरभरा पिकांना मिळणार लाभ

पुणे (प्रतिनिधी) ः हवामानाधारित रब्बी पिक विमा योजनेतील शेतकरी सहभागाची अंतिम मुदत हरभरा पिकासाठी 31 ऑक्‍टोबरवरुन 15 नोव्हेंबरपर्यंत तर गहू पिकासाठी 22 नोव्हेंबरवरुन 30 नोव्हेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे. नगर, सोलापूर, उस्मानाबाद, अमरावती व नागपूर या पाच जिल्ह्यांत ही योजना राबविण्यात येत आहे. यापैकी रब्बी ज्वारी पिकासाठी विमा संरक्षण मिळवण्याची अंतिम मुदत नुकतिच (31 ऑक्‍टोबर) संपली आहे.

रब्बी पिकांच्या पेरणीस विलंब झाल्याने हरभरा व गहू पिकांसाठी विमा उतरविण्याच्या अंतिम मुदतीत वाढ करण्याची मागणी कृषी आयुक्तालयामार्फत कृषी विमा कंपनीकडे करण्यात आली होती. यानुसार कंपनीने मुदतवाढीला हिरवा कंदील दाखवला असून राज्य शासनानेही याबाबतचा शासन आदेश जारी केला आहे. योजनेच्या इतर निकषांमध्ये काहीही बदल करण्यात आलेला नाही. योजना राबविण्यात येत असलेल्या पाच जिल्ह्यांतील अधिकाधिक शेतकऱ्यांनी योजनेत सहभाग घेवून पिकांना विमा संरक्षण मिळवावे, असे आवाहन कृषी आयुक्तालयामार्फत करण्यात आले आहे.
---------------- 

No comments:

Post a Comment