पुणे ः राज्यातील सर्वसामान्य शेतकऱ्यांचा शेती उत्पादनाचा नफा वाढविण्यासाठी
फळे व भाजीपाला प्रक्रीया तंत्रज्ञान मोहिम राबविण्याची गरज आहे, असे मत महाराष्ट्र
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक एन. के. जरग यांनी व्यक्त केले.
फळे व भाजीपाला प्रक्रीया महासंघामार्फत आयोजित सात दिवसांच्या प्रशिक्षण
कार्यक्रमाचा समारोप नुकताच झाला. यावेळी ते बोलत होते. नगरसेवक अशोक हरणावळ,
महासंघाचे अध्यक्ष बी.के.माने आदी यावेळी उपस्थित होते.
प्राचार्य एस.आर. नजन, प्रा. बी. बी. गुंजाळ, प्रा. संतोष घारे, प्रा. रमेश बेंद्र, प्रा. राऊत, जिल्हा उद्योग केंद्राचे अधिकारी एम. डी. लिके, एम.सी.डी.चे सुरेश उमप यांनी प्रशिक्षणात मार्गदर्शन केले. उषा माने, किर्ती जोशी, विद्या जव्हेरी व सुनिता घोगरे यांनी प्रात्यक्षिक प्रशिक्षण दिले. या प्रशिक्षणात 40 प्रशिक्षणार्थींना जॅम, जेली, सॉस, लोणची, सोया दुध, दुध प्रक्रिया व निर्जलीकरण यांचे प्रशिक्षण देण्यात आले.
-------------
प्राचार्य एस.आर. नजन, प्रा. बी. बी. गुंजाळ, प्रा. संतोष घारे, प्रा. रमेश बेंद्र, प्रा. राऊत, जिल्हा उद्योग केंद्राचे अधिकारी एम. डी. लिके, एम.सी.डी.चे सुरेश उमप यांनी प्रशिक्षणात मार्गदर्शन केले. उषा माने, किर्ती जोशी, विद्या जव्हेरी व सुनिता घोगरे यांनी प्रात्यक्षिक प्रशिक्षण दिले. या प्रशिक्षणात 40 प्रशिक्षणार्थींना जॅम, जेली, सॉस, लोणची, सोया दुध, दुध प्रक्रिया व निर्जलीकरण यांचे प्रशिक्षण देण्यात आले.
-------------
No comments:
Post a Comment