Wednesday, January 22, 2014

वसंतराव नाईक स्मृती प्रतिष्ठान "कृषिरत्न'

- राज्य कृषी विभागाचे पुरस्कार कृषिमंत्र्यांकडून जाहीर
- अनिल पाटील, गावडे, मराळे, घोलप आदी "कृषिभूषण'
- "सकाळ'चे बाळ बोठे, "ऍग्रोवन'चे जितेंद्र पाटील "शेतीमित्र'

पुणे (प्रतिनिधी) ः कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल राज्य शासनामार्फत देण्यात येणारा 2012 साठीचा "डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न' पुरस्कार अमरावतीतील वसंतराव नाईक स्मृती प्रतिष्ठानला जाहीर झाला आहे. "ऍग्रोवन'चे जळगावमधील बातमीदार जितेंद्र पाटील व "सकाळ'चे नगरचे निवासी संपादक ऍड. बाळ बोठे यांना "वसंतराव नाईक शेतीमित्र' पुरस्कार जाहीर झाले आहेत. कृषिमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विविध गटांतील 80 पुरस्कारांची घोषणा मंगळवारी (ता. 21) पुण्यात केली.

राज्यपाल के. शंकरनारायणन यांच्या हस्ते व मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीत येत्या 28 जानेवारीला सकाळी 11 वाजता डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठात (दापोली, रत्नागिरी) सर्व पुरस्कारविजेत्यांचा सपत्नीक सत्कार करून पुरस्कार वितरण होणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह कृषी व संलग्न विभागांचे आणि कोकणातील सर्व मंत्री पुरस्कार वितरण सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत.

पुरस्कारांचे नाव, स्वरूप व विजेते शेतकरी पुढीलप्रमाणे ः

1) "डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न' पुरस्कार ः 75 हजार रुपये, प्रशस्तिपत्र व स्मृतिचिन्ह ः
वसंतराव नाईक स्मृती प्रतिष्ठान, पुसद, यवतमाळ

2) "वसंतराव नाईक कृषिभूषण' पुरस्कार ः 50 हजार रुपये, प्रशस्तिपत्र व स्मृतिचिन्ह ः
अनिल नारायण पाटील (सांगे, वाडा, ठाणे), मधुसूदन केशव गावडे (वेतोरे, वेंगुर्ला, सिंधुदुर्ग), बाळासाहेब शंकर मराळे (शहा, सिन्नर, नाशिक), सुदाम किसन करंके (तऱ्हाडी, शिरपूर, धुळे), हिरालाल छन्नू पाटील (कुरवेल, चोपडा, जळगाव), अरुण गोविंद मोरे (शिरोली खुर्द, जुन्नर, पुणे), मच्छिंद्र भागवत घोलप (हनुमंतगाव, राहता, नगर), विष्णू रामचंद्र जरे (बहिरवाडी, जेऊर, नगर), हंबीरराव जगन्नाथ भोसले (खोडशी, कराड, सातारा), सूर्याजी गणपत पाटील (परिते, करवीर, कोल्हापूर), जगन्नाथ गंगाराम तायडे (औरंगपूर, औरंगाबाद), सूर्यकांतराव माणिकराव देशमुख (झरी, परभणी), रवींद्र रामकृष्ण मुळे (खानजमानगर, अचलपूर, अमरावती), सुधाकर रामचंद्र बानाईत (मधापुरी, मूर्तिजापूर, अकोला), रामभाऊ इसनजी कडव (इंदूरखा, कोथूर्णा, भंडारा), देवाजी मारोती बनकर (सडकअर्जुनी, गोंदिया).

3) "जिजामाता कृषिभूषण' पुरस्कार ः 50 हजार रुपये, प्रशस्तिपत्र व स्मृतिचिन्ह ः
सौ. रंजना रामचंद्र कदम (इळये, देवगड, सिंधुदुर्ग), सौ. सुनंदा प्रभाकर पाटील (मितावली, चोपडा, जळगाव), सौ. शकुंतला जनार्दन संकपाळ (झरेगाव, बार्शी, सोलापूर), सौ. साईश्रिया अशोक घाटे (सांगली), सौ. सरस्वती शिवाजी दाबेकर (कालिंकानगर, नेकनूर, बीड), सौ. अनुपमा भारत कुलकर्णी (नळदुर्गा, तुळजापूर, उस्मानाबाद), श्रीमती नीता राजेंद्र सावदे (कणी मिर्जापूर, नांदगाव खंडेश्‍वर, अमरावती), सौ. वंदना पंडितराव सवाई (उत्तमसरा, भातकुली, अमरावती), सौ. मालतीबाई मधुकर कुथे (गांगलवाडी, ब्रह्मपुरी, चंद्रपूर).

4) "कृषिभूषण' (सेंद्रिय शेती गट) ः 50 हजार रुपये, प्रशस्तिपत्र व स्मृतिचिन्ह ः
राजेंद्र श्रीकृष्ण भट (बेडशिळ, अंबरनाथ, ठाणे), यशवंत वंजी पवार (वरसूत, सिंदखेडा, धुळे), बापूसाहेब निवृत्ती गाडे (भैरवनाथनगर, श्रीरामपूर, नगर), सुदाम अर्जुन सरोदे (डोऱ्हाळे, राहता, नगर), संभाजी धोंडीराम बोराडे (शेगाव, जत, सांगली), मंगेश धर्मराज थोरात (पांगरी, धारुर, बीड), माधवराव बापूराव अंधारे (गणेशपूर, जाफराबाद, जालना), बालासाहेब रघुनाथराव पांढरे (चिंचोलीराव, गंगापूर, लातूर), मधुकरराव राजाराम सरप (कानेरी सरप, बार्शी टाकळी, अकोला), डॉ. नारायण चिंधूजी लांबट (चिखलापार, भिवापूर, नागपूर).

5) कृषिभूषण (सेंद्रिय शेती संस्था गट) ः 50 हजार रुपये, प्रशस्तिपत्र व स्मृतिचिन्ह ः
श्री स्वामी समर्थ कृषी विकास व संशोधन चॅरिटेबल ट्रॅस्ट, दिंडोरी, जि. नाशिक (श्रीराम खंडेराव मोरे).

6) "वसंतराव नाईक शेतीमित्र' पुरस्कार ः 30 हजार रुपये, प्रशस्तिपत्र व स्मृतिचिन्ह ः
ऍड. बाळासाहेब जगन्नाथ बोठे पाटील (नगर), जितेंद्र रधुनाथ पाटील (ममुराबाद, जळगाव), राहुल मनोहर खैरनार (मालेगाव, नाशिक), रावसाहेब बाळू पुजारी (तमदलगे, शिरोळ, कोल्हापूर), अतुल अविनाश कुलकर्णी (विडा, केज, बीड).

7) "उद्यानपंडित' पुरस्कार ः 15 हजार रुपये, प्रशस्तिपत्र व स्मृतिचिन्ह ः
दीनानाथ विनायक धारगळकर (आडेली, वेंगुर्ला, सिंधुदुर्ग), विनायक रघुनाथ बारी (कंकाडी, डहाणू, ठाणे), रवींद्र काशिनाथ चव्हाण (म्हसदी, साक्री, धुळे), मारुती संपत डाके (दत्तवाडी, श्रीगोंदा, नगर), सौ. अंजली जयकुमार देसाई (पेठ वडगाव, हातकणंगले, कोल्हापूर), अभिमन्यू शंकरराव कडबाने (बोरीसावरगाव, केज, बीड), दिलीप माधवराव पावडे (पावडेवाडी, नांदेड), विश्‍वासराव जयराम बोरकर (नंधाना, रिसोड, वाशिम), सतीश नथ्थूजी खुबाळकर (खुबाळा, सावनेर, नागपूर).

8) "वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी' पुरस्कार (सर्वसाधारण गट) ः 11 हजार रुपये, प्रशस्तिपत्र व स्मृतिचिन्ह ः
विजय जगन्नाथ माळी (शिरगाव, पालघर, ठाणे), वसंत केरू गायकवाड (आपटी, दापोली, रत्नागिरी), सुधाकर प्रकाश वाघ (खलाणे, सिंदखेडा, धुळे), प्रकाश खुशाल पाटील (म्हसावद, शहादा, नंदुरबार), साहेबराव नामदेव मोहिते (काटी, इंदापूर, पुणे), सचिन अरुणराव जगताप (बनपिंपरी, श्रीगोंदा, नगर), अविनाश अरविंद जामदार (कोकणगाव, श्रीगोंदा, नगर), रवी अशोक पाटील (अकेलखोप, पलुस, सांगली), आनंदराव गणपत शिंदे (बोरगाव, सातारा), बाबासाहेब रंगनाथ खांडेभराड (माहेर भायगाव, अंबड, औरंगाबाद), तात्यासाहेब तुळशीराम गोरे (अंतरगाव, भूम, उस्मानाबाद), संग्राम माणिकराव डोंगरे (साकोळ, शिरूर अनंतपाळ, लातूर), उमेश मोहनराव ठोकळ (दहीगाव गावंडे, अकोला), सौ. चंद्रकलाबाई प्रकाश सुरुशे (शेलगाव आटोळ, चिखली, बुलडाणा), अशोक बालाराम गायधने (शिवणी, आमगाव, गोंदिया), दिनेश नामदेवराव शेंडे (मेंढा, सिंदेवाही, चंद्रपूर), संजय विठ्ठलराव अवचट (वाहितपूर, सेलू, वर्धा), सीताराम व्येंका मडावी (जिजगाव, भामरागड, गडचिरोली).

9) "वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी' पुरस्कार (आदिवासी गट) ः 11 हजार रुपये, प्रशस्तिपत्र व स्मृतिचिन्ह ः
श्रीमती कासाबाई दत्तू शिंद (मढवाडी, मुरबाड, ठाणे), संजय रतन ठाकरे (भावनगर, सटाणा, नाशिक), रमण खापऱ्या गावित (रायपूर, नवापूर, नंदुरबार), दिगंबर निंबाजी गवारी (असाणे, आंबेगाव, पुणे), किसन भुऱ्या कास्देकर (बारू, धारणी, अमरावती), बळवंत सदाशिव डडमल (मांडवा, हिंगणा, नागपूर).

10) राज्यस्तरीय खरीप भातपीक स्पर्धा विजेते शेतकरी (प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक अनुक्रमे 10 हजार, 7 हजार व 5 हजार रुपये, प्रशस्तिपत्र व स्मृतिचिन्ह.)
प्रथम ः हंबीरराव जगन्नाथ भोसले, हेक्‍टरी 112 क्विंटल 19 किलो उत्पादन (खोडशी, कराड, सातारा),
द्वितीय ः नागेश कृष्णा बामणे, हेक्‍टरी 92 क्विंटल 25 किलो उत्पादन (सरोळी, गडहिंग्लज, कोल्हापूर),
तृतीय ः एकनाथ गंगाराम शिंदे, हेक्‍टरी 89 क्विंटल 52 किलो उत्पादन (बेलावडे, जावली, सातारा).
---------

No comments:

Post a Comment