पुणे ः राज्याच्या भुमी अभिलेख विभागाने यापुढे प्रत्येक शुक्रवारी सकाळी एक तास कार्यलयीन परिसरात स्वच्छता अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे. भुमी अभिलेखच्या राज्यातील सर्व कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी या दिवशी एक तास परिसर स्वच्छता करणार आहे. जमाबंदी आयुक्त आणि भुमी अभिलेख संचालक चंद्रकांत दळवी यांनी याबाबतच्या सुचना दिल्या आहेत.
गांधी जयंती निमित्त केंद्र शासनामार्फत आयोजित स्वच्छ भारत अभियान भुमि अभिलेखमार्फत नवीन प्रशासकीय इमारत परिसरात राबविण्यात आले. श्री. दळवी यांनी सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांना यावेळी स्वच्छता शपथ दिली. यावेळी दर आठवड्याला स्वच्छता करण्याचा निर्णय घेण्यात आला.
-------------
No comments:
Post a Comment