Friday, February 13, 2015

किमान तापमानात वाढ, हवामान कोरडे - 13 फेब्रुवारी

पुणे (प्रतिनिधी) ः राज्यात बहुतांश ठिकाणी किमान तापमानात सरासरीहून वाढ झाली आहे. हवामान खात्याने रविवारी सकाळपर्यंत (ता.15) राज्यात सर्वत्र आकाश निरभ्र व हवामान कोरडे राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. राज्यात कोठेही पावसाची शक्‍यता वर्तविण्यात आलेली नाही.

कोकणाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीपेक्षा दोन ते तीन अंशांची लक्षणीय घट झाली आहे. मध्य महाराष्ट्रात किमान तापमानात सरासरीपेक्षा दोन ते तीन अंशांची लक्षणीय वाढ झाली आहे. मराठवाडा व विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीपेक्षा किंचित वाढ झाली आहे. राज्याच्या उर्वरीत भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास होते. मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात आकाश अंशतः ढगाळलेले होते. नाशिक येथे राज्यात सर्वात कमी 11.1 अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदवण्यात आले.

शुक्रवारी (ता.13) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या चोविस तासातील किमान तापमान अंश सेल्सिअसमध्ये ः कुलाबा 21, सांताक्रुझ 16.5, अलिबाग 18.4, रत्नागिरी 16.5, पणजी 19.8, डहाणू 18, भिरा 13, पुणे 12.7, नगर 13.8, जळगाव 14.3, कोल्हापूर 18, महाबळेश्‍वर 15.2, मालेगाव 14.5, नाशिक 11.1, सांगली 16.2, सातारा 14.1, सोलापूर 17.8, औरंगाबाद 15.4, परभणी 17.4, नांदेड 13, अकोला 15.6, अमरावती 16.6, बुलडाणा 15.8, ब्रम्हपुरी 17.7, चंद्रपूर 18.4, नागपूर 15.4, वाशिम 19.4, वर्धा 16.6, यवतमाळ 16.4
---------------- 

No comments:

Post a Comment