Wednesday, February 4, 2015

कृषी विभागात पुढील वर्षी भरती


पुणे (प्रतिनिधी) ः राज्य कृषी विभागातील विविध रिक्त व संभाव्य रिक्त पदांची कर्मचारी भरती येत्या आर्थिक वर्षात (2015-16) होण्याची शक्‍यता आहे. याबाबतचा आढावा घेण्याचे काम कृषी आयुक्तालय स्तरावर सुरु आहे. आयुक्तालयाच्या आस्थापना शाखेमार्फत सर्व विभागिय कृषी सहसंचालक कार्यालयांकडून त्यांच्या अखत्यारितील संवर्गनिहाय रिक्त पदे व येत्या वर्षभरात सेवा निवृत्तीने रिक्त होणारी संभाव्य पदे यांची माहिती मागविण्यात आली आहे.

कृषी सेवेतील विविध पदांची भरती 2012-13 व 2013-14 या सलग दोन वर्षे मोठ्या प्रमाणात राबविण्यात आली. क गटातील कृषी सेवक, अधिक्षक, लिपीक आदी पदांच्या सुमारे दोन हजाराहून अधिक जागा यात भरण्यात आल्या. याशिवाय महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत अ, ब, ब कनिष्ट वर्ग अधिकाऱ्यांचीही भरती झाली. यानंतर चालू वर्षी (2014-15) कृषी विभागात भरती प्रक्रीया राबविण्यात आलेली नाही. आता येत्या आर्थिक वर्षात पुन्हा भरती प्रक्रीया राबविण्याचे कृषी विभागाचे नियोजन असून त्यासाठी रिक्त पदांचा आढावा घेण्यात येत आहे.

कृषी विभागाने 2012 च्या भरती प्रक्रीयेपासून गट क संवर्गातील कृषी सेवक, लिपीक, वरिष्ठ लिपीक, सहायक अधिक्षक या पदांची केंद्रीय पद्धतीने भरती प्रक्रीया सुरु केली आहे. हीच पद्धत आगामी भरतीतही कायम राहणार असून राज्य पातळीवर एकाच वेळी लेखी परिक्षेद्वारे उमेदवार निवड करण्यात येणार असल्याची माहिती कृषी आयुक्तालयातील सुत्रांनी दिली.
ृ---------------- 

No comments:

Post a Comment