Wednesday, February 4, 2015

हवामान अंदाज, ४ फेब्रुवारी १५


पुणे (प्रतिनिधी) ः ढगाळ हवामानाच्या प्रभावामुळे मध्य महाराष्ट्रात शुक्रवारी (ता.6) सकाळपर्यंत किमान तापमानात दोन ते तीन अंश सेल्सिअसने घट होण्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केलेला आहे. उर्वरित महाराष्ट्रात सर्वत्र हवामान कोरडे राहण्याचा व तापमानात फारसा बदल न होण्याचा अंदाज आहे. बुधवारी सकाळपर्यंतच्या चोविस तासात मध्य महाराष्ट्रात बहुतेक ठिकाणी किमान तापमान सरासरीहून दोन ते तीन अंशांनी उचावलेले होते. हे तापमान सरासरीवर येण्याची चिन्हे आहेत.

मराठवाड्याच्या काही भागात किमान तापमानात सरासरीपेक्षा किंचित घट झाली आहे. मध्य महाराष्ट्राच्या काही भागात व मराठवाड्याच्या उर्वरित भागात किमान तापमानात सरासरीपेक्षा दोन ते चार अंश सेल्सिअसने लक्षणीय वाढ तर कोकण व विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीपेक्षा किंचित वाढ झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमानात सरासरीच्या जवळपास होते. नांदेड येथे राज्यात सर्वात कमी 11.5 अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदवले गेले. मध्य महाराष्ट्रात आकाश अंशतः ढगाळले आहे.

बुधवारी (ता.4) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या चोविस तासातील प्रमुख ठिकाणचे किमान तापमान अंश सेल्सिअसमध्ये ः कुलाबा 21, सांताक्रुझ 17.4, अलिबाग 19.2, रत्नागिरी 18.3, पणजी 20.3, डहाणू 19.4, भिरा 14.5, पुणे 12.6, नगर 12, जळगाव 13.2, कोल्हापूर 16.6, महाबळेश्‍वर 14.1, मालेगाव 17.2, नाशिक 14.2, सांगली 16.3, सातारा 12.7, सोलापूर 15.8, उस्मानाबाद 13.2, औरंगाबाद 16.3, परभणी 15.3, नांदेड 11.5, बीड 17.4, अकोला 18.1, अमरावती 16, बुलडाणा 17.2, ब्रम्हपुरी 14.7, चंद्रपूर 11.6, नागपूर 13.9, वाशिम 19, वर्धा 15.4, यवतमाळ 15.6
--------------- 

No comments:

Post a Comment