Thursday, February 12, 2015

राज्यात हवामान कोरडे राहण्याचा अंदाज

पुणे (प्रतिनिधी) ः शनिवारी (ता.14) सकाळपर्यंत राज्यात सर्वत्र हवामान कोरडे व आकाश निरभ्र राहण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. लक्षद्विप बेटांपासून गुजरातपर्यंतच्या कमी दाबाच्या पट्ट्याची तिव्रता कमी झाली असून तो आता उत्तर कोकणापर्यंत सक्रीय आहे.

गुरुवारी सकाळपर्यंतच्या चोविस तासात विदर्भाच्या काही भागात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. उर्वरीत राज्यात हवामान कोरडे होते. दिवसभरात पुण्यात राज्यात सर्वात कमी 12.6 अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदविण्यात आले. कोकण गोव्याच्या काही भागात किमान तापमानात सरासरीपेक्षा किंचित घट तर मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याच्या काही भागात किमान तापमानात सरासरीहून लक्षणीय वाढ झाली. विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीपेक्षा किंचित वाढ झाली. राज्याच्या उर्वरीत भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास होते.

राज्यात विविध ठिकाणी गुरुवारी (ता.12) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या चोविस तासात नोंदविण्यात आलेले किमान तापमान अंश सेल्सिअसमध्ये ः कुलाबा 21, सांताक्रुझ 16.8, अलिबाग 19.4, रत्नगिरी 17, पणजी 20, डहाणू 19.9, भिरा 13.1, पुणे 12.6, नगर 13.5, जळगाव 15.3, कोल्हापूर 17.6, महाबळेश्‍वर 15.4, मालेगाव 15.2, नाशिक 12.8, सांगली 15.7, सातारा 13.9, सोलापूर 16.1, उस्मानाबाद 13.8, औरंगाबाद 16.7, परभणी 17, नांदेड 13.5, बीड 17.6, अकोला 18.6, अमरावती 16.4, बुलडाणा 16.6, ब्रम्हपुरी 16.4, चंद्रपूर 17.6, नागपूर 15.4, वाशिम 19.4, वर्धा 16, यवतमाळ 14.6
------------ 

No comments:

Post a Comment