Wednesday, January 7, 2015

माझंही ऐका.... रमेश भोयर, वाशिम

कृषीवाले म्हणतात... शासनाकडे फंड नाही !

मी विदर्भातील वाशीम जिल्ह्यातील कास्तकार आहे. माझ्याकडे दोन हेक्‍टर डाळींब आहे. तीन वर्षे झाली, मी सामुहिक शेततळे घेतले. मागिल वर्षी 2 फेब्रुवारी 2014 ला शेततळ्याचे संपूर्ण खोदकाम व मातीकाम केले. खोदकामाची 80 टक्के बिलाच्या रकमेचा 46 हजार 464 रुपयांचा चेक मिळाला. या चेकवर 31 मार्च 2014 चा होता. प्रत्यक्षात रक्कम 10 जूनला खात्यात जमा झाली. चेक काढणाऱ्या कृषी विभागापासून बॅंकेत 20 किलोमिटर अंतरावर चेक पाठविण्यासाठी मार्च ते जून एवढा मोठा कालावधी लागला. तीन-चार महिने चेक पडून होता.

यानंतर शेततळ्यांत ताडपत्री (प्लॅस्टिक) अस्तरीकरण करण्यासाठी बुलडाणा जिल्ह्यातील लोणार येथिल डिलरकडे ताडपत्रीचा करार केला. त्यासाठी कृषी विभागाच्या नियमाप्रमाणे नोटरी केली. ताडपत्री अस्तरीकरणाचे काम 25 मे 2014 ला पूर्ण झाले. त्यानंतर लगेच शेततळ्या कंपाऊंड नेट लावली. संपूर्ण कामाचे बील फोटोंसह वाशिम कृषी विभागाचे उपविभागिय कृषी अधिकारी (एसडीओ) इंगळे साहेब यांच्याकडून जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी (एसएओ) हिंदुराव चव्हाण यांच्याकडे वाशिमला गेले. प्रत्यक्षात पैसे मिळाले नाहीत. एसएओ कार्यालयातील कर्मचारी श्री. घुमडे (8856862669) यांच्याकडे 10 वेळा गेलो. चौकशी केली. प्रत्येक वेळी त्यांनी शासनाकडे फंड नाही, असे सांगितले. अखेर एसएओ चव्हाण यांना भेटलो. त्यांनी सुद्धा शासनाकडे फंड नाही, असेच सांगीतले. हेलपाटे मारुन दमलो पण आजपर्यंत ताडपत्री व कंपाऊंडचे बिल मिळालेले नाही. शासनाकडे 1450 कोटी रुपये पडून आहेत असे ऍग्रोवनमध्ये वाचले. परंतु कृषी विभागाचे कर्मचारी तर पैसे नाहीत, असे सांगतात....

रमेश दी. भोयर, मु.पो. ता. मालेगाव, जि. वाशिम 8888612130
------------------- 

No comments:

Post a Comment