Sunday, May 18, 2014

लोकसभा निवडणूक निकाल - प्रतिक्रीया - राजाराम देशमुख, कृषी

---------------
डॉ. राजाराम देशमुख, माजी कुलगुरु, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, नगर.
---------------
देशातील कृषी क्षेत्रासाठी केंद्र शासनाने गेल्या पाच दहा वर्षात अनेक नवीन अभियाने तयार केली आहेत. त्यांची अंमलबजावणीही चांगल्या प्रकारे सुरु आहे. सरकार कुणाचेही येवो, येत्या पाच वर्षात ही अभियाने अशिच पुढे सुरु रहायला हवीत. पुढील पाच वर्षात प्रत्येक राज्याच्या दृष्टीने काही गोष्टी महत्वाच्या राहतील. महाराष्ट्राचा विचार करता सिंचनाच्या दृष्टीने पाणलोटाची कामे, त्यातून उपलब्ध होणारे पाणी, मुलस्थानी जलसंधारण आणि त्यासाठी अवजारांचा उपयोग, उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर होण्यासाठी पिक पद्धती व पिकांना पाणी देण्याच्या ठिबक व तुषार सिंचनासारख्या आधुनिक पद्धती महत्वाच्या ठरणार आहेत. धोरणात या गोष्टी आहेतच, पण अंमलबजावणीच्या पातळीवरही त्यास प्राधान्य द्यायला हवे.

गेल्या काही वर्षात निर्यातबंदी ही फार मोठी समस्या देशाच्या कृषी क्षेत्रापुढे उभी राहीली आहे. त्यासाठी रासायनिक अंश मुक्त उत्पादन आणि योग्य पिक पद्धतीचा अवलंब करण्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. ग्रेपनेट सारखी यंत्रणा सर्वच पिकांच्या बाबतीत उभी राहण्याची गरज आहे. उत्पादन जास्त झाले आणि निर्यात झाली नाही तर बाजारभाव कोसळून शेतकर्यांचे फार मोठे नुकसान होते. हे धोके टाळण्यासाठी केंद्राकडून ठोस उपाययोजना व्हायला हव्यात.

अनेकदा केंद्र म्हणते की कृषी हा राज्यांचा विषय आहे. मात्र याच वेळी राज्य त्याकडे गांभिर्याने पाहत नाही. महाराष्ट्रातही अनेक बाबतीत अशी स्थिती आहे. कृषी शिक्षण आणि संशोधनातही अनेक बाबतीत अमुलाग्र विकास होणे गरजेचे आहे. राज्य आणि केंद्रातील सुसंवाद आणि त्यातून कृषीला अधिकाधिक चालना अपेक्षित आहे. केंद्राने गेल्या 10 वर्षात सुर केलेले उपक्रम स्त्युत आहेत. त्यात अजून बारकाईने लक्ष घालून पुढे नेले पाहिजे.
----------------

No comments:

Post a Comment