Thursday, May 15, 2014

राज्यात कमाल तापमान सरासरीवर

पुणे (प्रतिनिधी) ः राज्यात सर्वत्र हवामान कोरडे झाले आहे. यामुळे किमान तापमानाचा पारा पुन्हा सरासरीवर स्थिरावला आहे. मंगळवारी सकाळपर्यंतच्या चोविस तासात वर्धा येथे राज्यातील सर्वाधिक 42.6 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. भारतीय हवामान खात्याने गुरुवारी (ता.15) सकाळपर्यंत राज्यात कोरडे हवामान कायम राहून कमाल तापमानात फारसा बदल होणार नसल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

विदर्भाच्या काही भागात कमाल तापमान सरासरीहून किंचित घटलेले असून उर्वरीत महाराष्ट्रात सर्वत्र कमाल तापमानाचा पारा सरासरीच्या जवळपास आहे. याच वेळी किमान तापमानातही बहुतेक ठिकाणी सरासरीहून अल्पशी घट झालेली आहे. महाराष्ट्र पुर्णतः कोरडा तर शेजारील राज्यांमध्ये अंशतः ढगाळलेले हवामान असल्याची स्थिती आहे. पुढील दोन दिवस ही स्थिती कायम राहण्याची चिन्हे आहेत. पुणे वेधशाळेकडील नोंदीनुसार मंगळवारी सकाळपर्यंत राज्यात कोठेही पावसाची नोंद झाली नाही. हवामान खात्यामार्फत बुधवारी राज्यात कोठेही पावसाची शक्‍यता वर्तविण्यात आलेली नाही.

राज्यात प्रमुख ठिकाणी मंगळवारी (ता.13) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या चोविस तासात नोंदविण्यात आलेले कमाल तापमान अंश सेल्सिअसमध्ये ः मुंबई 33.8, अलिबाग 33.6, रत्नागिरी 33.3, पणजी 34, डहाणू 33.5, पुणे 35.9, नगर 38.8, जळगाव 40.7, महाबळेश्‍वर 28.7, मालेगाव 41, नाशिक 35.3, सांगली 38.8, सातारा 36.9, सोलापूर 39.2, उस्मानाबाद 37, औरंगाबाद 37, परभणी 40.4, अकोला 40.2, अमरावती 41.8, बुलडाणा 37, ब्रम्हपुरी 42, चंद्रपूर 42, गोंदिया 40.3, नागपूर 41.8, वाशिम 38, वर्धा 42.6, यवतमाळ 39.4
-----------(समाप्त)------------

No comments:

Post a Comment