Friday, April 11, 2014

गारपिटग्रस्तांसाठी मदतीचे आवाहन

पुणे ः येथिल आपुलकी सामाजिक संस्थेमार्फत राज्यातील पाच गारपिटग्रस्त गावांना येत्या खरिपासाठी मदत करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे. येत्या खरिपात बियाण्यासाठी प्रत्येक गारपीटग्रस्त शेतकरी कुटुंबाला किमान एक हजार 800 रुपये देण्याचा संस्थेचा प्रयत्न आहे. यासाठी शेतकर्यांना सढळ हाताने मदत करण्याचे आवाहन संस्थेमार्फत करण्यात आले आहे.

वर्धा जिल्ह्यातील ब्राम्हणवाडा व औरंगाबाद जिल्ह्यातील देवगाव या गावांत गारपीटीने झालेल्या नुकसानीची पहाणी केल्यानंतर गारपीटग्रस्त शेतकर्यांच्या मदतीसाठी आपुलकीमार्फत "माझी संवेदना माझा शेतकरी' हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. याउपक्रमाअंतर्गत पाच गावातील सुमारे 1250 कुटुंबांना संस्थेमार्फत मदत करण्यात येणार आहे. यासाठी सुमारे 22 लाख 50 हजार रुपये निधी उभारणीचे काम संस्थेने हाती घेतले असून त्यासाठी जगभरातील मराठी व्यक्तींकडून निधी संकलन सुरु करण्यात आले आहे. यातील पहिला कार्यक्रम इंग्लंडमधील इलफोर्ड मराठी मित्र मंडळात होणार आहे.

राज्यातील संवेदनशिल व्यक्तींनी गारपीटग्रस्तांना सढळ हाताने मदत करावी आणि किमान एका शेतकरी कुटुंबाचा बियाण्याच्या खर्चाची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घ्यावी, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष अभिजित फाळके यांनी केले आहे. अधिक माहिती व मदतीसाठी संपर्क ः श्री. फाळते - 8983357559
-------------------

No comments:

Post a Comment