Saturday, April 19, 2014

कळवणमध्ये रविवारी "ऍग्रोवन संवाद' चर्चासत्रे

सकाळ - नाशिक आवृत्तीसाठी
--------------
ऍग्रोवन वर्धापनदिनानिमित्त आयोजन

नाशिक, ता. 17 ः दैनिक सकाळ ऍग्रोवनच्या 9 व्या वर्धापनदिनानिमित्त येत्या रविवारी (ता.20) कळवण तालुक्‍यातील कनाशी येथे मिरची व भाजीपाला उत्पादन तंत्रज्ञान या विषयांवरील "ऍग्रोवन संवाद' चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. कनाशीमधील जय योगेश्‍वर मंगल कार्यालयात सकाळी साडेदहा वाजता चर्चासत्राला प्रारंभ होणार आहे. हे चर्चासत्र सर्वांसाठी मोफत खुले आहे.

चर्चासत्रात नाशिकमधील के. के. वाघ कृषी महाविद्यालयाचे सहयोगी प्राध्यापक तुषार उगले शेतकर्यांना मार्गदर्शन करणार आहेत. शेतकर्यांना मिरची व इतर भाजीपाला पिकांतील नवीन तंत्रज्ञान, उत्पादन पद्धती, उत्पादकता आणि गुणवत्तावाढीची सुत्रे या चर्चासत्रातून आत्मसाद करता येणार आहेत. तज्ज्ञांशी थेट संवाद साधून आपल्या भाजीपाला पिकविषयक समस्यांवर उपाय मिळवण्यासाठीही हे चर्चासत्र उपयुक्त ठरणार आहे. दीपक फर्टिलायझर्स हे या चर्चासत्राचे प्रायोजक आहेत.

येत्या 20 एप्रिल रोजी दै. ऍग्रोवन 10 व्या वर्षात पदार्पन करत आहे. त्यानिमित्त राज्यात ठिकठिकाणी विविध विषयांवरील "ऍग्रोवन संवाद' चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. या चर्चासत्रांमध्ये शेतकर्यांना मान्यवर तज्ज्ञांकडून भाजीपाला, केळी, डाळींब, कापूस, द्राक्ष, आले, ऊस आदी पिकांचे उच्चांकी उत्पादन घेण्याची गुरुकिल्ली मिळविण्याची संधी उपलब्ध करुन देण्यात येत आहे. विभागातील अधिकाधिक शेतकरी व कृषी संबंधीत व्यक्तींनी या चर्चासत्रांचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांमार्फत करण्यात आले आहे.

*चौकट
चर्चासत्र विषय - मिरची व भाजीपाला उत्पादन तंत्र
वक्ते - प्रा. तुषार उगले, के.के.वाघ कृषी महाविद्यालय, नाशिक
ठिकाण - जय योगेश्‍वर मंगल कार्यालय, कनाशी, ता. कळवण, जि. नाशिक
वेळ - सकाळी 10.30
--------(समाप्त)-------

No comments:

Post a Comment