Saturday, April 19, 2014

कोल्हापूर, सांगलीत रविवारी "ऍग्रोवन संवाद' चर्चासत्रे

सकाळ - कोल्हापूर आवृत्तीसाठी
--------------
ऍग्रोवन वर्धापनदिनानिमित्त आयोजन

पुणे (प्रतिनिधी) ः दैनिक सकाळ ऍग्रोवनच्या 9 व्या वर्धापनदिनानिमित्त येत्या रविवारी (ता.20) कोल्हापूर व सांगलीमध्ये अनुक्रमे एकरी शंभर टन ऊस उत्पादन व द्राक्ष एप्रिल छाटणी नियोजन या विषयांवरील "ऍग्रोवन संवाद' चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. ही चर्चासत्रे सर्वांसाठी मोफत खुली आहेत.

कोल्हापूर जिल्ह्यातील चर्चासत्र पन्हाळा तालुक्‍यातील दिगवडे येथे प्रकाश कुलकर्णी यांच्या मळ्यात सकाळी साडेदहा वाजता सुरु होणार आहे. "एकरी शंभर टन ऊस उत्पादन आणि सेंद्रीय शेतीचे महत्व' हा या चर्चासत्राचा विषय असून त्यात कोल्हापूरातील प्रादेशिक ऊस व गुळ संशोधन केंद्राचे डॉ. डी. एम. वीर मार्गदर्शन करणार आहेत. ग्रीनलॅंन्ड प्रा. लि. हे या चर्चासत्राचे प्रायोजक आहेत.

सांगली जिल्ह्यातील चर्चासत्र तासगाव तालुक्‍यातील राजापूर गावातील गणेश मंदीराच्या सभागृहात सायंकाळी साडेपाच वाजता सुरु होईल. "द्राक्ष एप्रिल छाटणी नियोजन' हा या चर्चासत्राचा विषय असून त्यात द्राक्षतज्ज्ञ एस. टी. शिंदे मार्गदर्शन करणार आहेत. निसर्ग फर्टिलायझर्स प्रा. लि. हे या चर्चासत्राचे प्रायोजक आहेत. शेतकर्यांना आपल्या पिकाविषयीच्या समस्यांवर थेट तज्ज्ञांशी संवाद साधून उपायही मिळविण्याची संधी या चर्चासत्रांतून उपलब्ध होणार आहे.

येत्या 20 एप्रिल रोजी दै. ऍग्रोवन 10 व्या वर्षात पदार्पन करत आहे. त्यानिमित्त राज्यात ठिकठिकाणी विविध विषयांवरील "ऍग्रोवन संवाद' चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. या चर्चासत्रांमध्ये शेतकर्यांना मान्यवर तज्ज्ञांकडून भाजीपाला, केळी, डाळींब, कापूस, द्राक्ष, आले, ऊस आदी पिकांचे उच्चांकी उत्पादन घेण्याची गुरुकिल्ली मिळविण्याची संधी उपलब्ध करुन देण्यात येत आहे. विभागातील अधिकाधिक शेतकरी व कृषी संबंधीत व्यक्तींनी या चर्चासत्रांचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांमार्फत करण्यात आले आहे.
--------(समाप्त)------- 

No comments:

Post a Comment