Saturday, April 19, 2014

नागपूर - "ऍग्रोवन संवाद' चर्चासत्र

नागपूर सकाळ साठी
---------------
पुणे (प्रतिनिधी) ः दैनिक सकाळ ऍग्रोवनच्या 9 व्या वर्धापनदिनानिमित्त येत्या रविवारी (ता.20) काटोल तालुक्‍यातील पारडसिंगा येथे कपाशी पिकाचे व्यवस्थापन या विषयावरील "ऍग्रोवन संवाद' चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. नागपूरमधील केंद्रीय कापूस संशोधन संस्थेच्या शास्त्रज्ञ डॉ. सौ. विनिता गोटमारे या चर्चासत्रात शेतकर्यांना मार्गदर्शन करणार आहेत. मातोश्री कौसल्याबाई सोमकुंवर सभागृहात सकाळी 11 वाजता या चर्चासत्राचा प्रारंभ होणार आहे.

कापूस पिक उत्पादनाचे नवीन तंत्रज्ञान, सघन कापूस लागवड, देशी वाण उपलब्धता, किड व रोग व्यवस्थान, केंद्रीय कापूस संशोधन संस्थेचे कापूसविषयक नवीन उपक्रम आणि त्यातील शेतकरी सहभाग आदी विषयक माहिती या चर्चासत्रात देण्यात येणार आहे. याशिवाय शेतकर्यांना आपल्या कापूस पिकाविषयीच्या समस्यांवर थेट शास्त्रज्ञांशी संवाद साधून उपायही मिळविण्याची संधी उपलब्ध होणार आहे. हे चर्चासत्र सर्वांसाठी मोफत खुले आहे. विभागातील अधिकाधिक शेतकरी व कृषी संबंधीत व्यक्तींनी या चर्चासत्रांचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांमार्फत करण्यात आले आहे.

येत्या 20 एप्रिल रोजी दै. ऍग्रोवन 10 व्या वर्षात पदार्पन करत आहे. त्यानिमित्त राज्यात ठिकठिकाणी विविध विषयांवरील "ऍग्रोवन संवाद' चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. या चर्चासत्रांमध्ये शेतकर्यांना मान्यवर तज्ज्ञांकडून भाजीपाला, केळी, डाळींब, कापूस, द्राक्ष, आले, ऊस आदी पिकांचे उच्चांकी उत्पादन घेण्याची गुरुकिल्ली मिळविण्याची संधी उपलब्ध करुन देण्यात येत आहे.

*चौकट
ठिकाण - मातोश्री कौसल्याबाई सोमकुंवर सभागृह, पारडसिंगा, ता. काटोल
वेळ - सकाळी 11
विषय - कपाशी पिक व्यवस्थापन
वक्ते - डॉ. सौ. विनिता गोटमारे, शास्त्रज्ञ, सीआयसीआर, नागपूर
--------(समाप्त)-------- 

No comments:

Post a Comment