Wednesday, April 16, 2014

कृषी विद्यापीठांच्या रचनेचाच होणार फेरविचार

राज्य शासनामार्फत डॉ. अलग समिती स्थापन

पुणे (प्रतिनिधी) ः राज्याच्या कृषी क्षेत्रात होत असलेल्या बदलांची दखल घेवून कृषी विद्यापीठांची उद्दीष्टे आणि कामकाज पद्धतीचा फेरविचार करुन सुधारणांसाठीचा अभ्यासपूर्ण अहवाल तयार करण्यासाठी राज्य शासनामार्फत नियोजन आयोगाचे माजी उपाध्यक्ष डॉ. वाय. के. अलग यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. येत्या सहा महिन्यात ही समिती आपल्या शिफारशी राज्य शासनास सादर करणार आहे.
-----------------
...अशी आहे उच्चस्तरिय समिती
डॉ. वाय. के. अलग, माजी उपाध्यक्ष, नियोजन आयोग, भारत सरकार (अध्यक्ष)
डॉ. वाय. एस. पी. थोरात, कार्याध्यक्ष, महाराष्ट्र राज्य कोरडवाहू शेती अभियान (उपाध्यक्ष)
उमाकांत दांगट, कृषी आयुक्त, महाराष्ट्र राज्य
एकनाथ डवले, पशुसंवर्धन आयुक्त, महाराष्ट्र राज्य
डॉ. एस. एन. पुरी, कुलगुरु, केंद्रीय कृषी विद्यापीठ, इंफाळ
डॉ. सी. डी. मायी, माजी अध्यक्ष, कृषी शास्त्रज्ञ निवड मंडळ
डॉ. एस. ए. पाटील, माजी संचालक, भारतीय कृषी संशोधन संस्था, अध्यक्ष, कर्नाटक कृषी अभियान
डॉ. राजाराम देशमुख, माजी कुलगुरु, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी
डॉ. शंकरराव मगर, माजी कुलगुरु, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली
डॉ. एस. एस. कदम, माजी कुलगुरु, वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ, परभणी
डॉ. उत्तम कदम, शिक्षण संचालक, कृषी परिषद (सदस्य सचिव)
------------------
... समितीच्या मदतीसाठी
चारही कृषी विद्यापीठे व माफसूचे विद्यमान कुलगुरु, हैदराबादमधील अखिल भारतीय कृषी हवामानशास्त्र संशोधन प्रकल्पाचे समन्वयक डॉ. व्हि. यु. एम. राव, आयसीएआरच्या कृषी यंत्रे व शक्ती विभागाचे माजी प्रकल्प संचालक डॉ. सुरींदर सिंग, आयसीएआरच्या काढणी पश्‍चात तंत्रज्ञान माजी प्रकल्प संचालक डॉ. आर. टी. पाटील, गोकुळ सहकारी दुघ संघाचे माजी अध्यक्ष अरुण नरके, औरंगाबादमधील उद्योजक अतुल बंगीनवार हे या समितीसाठी मदतनिसाची भुमिका पार पाडणार आहेत.
------------------
डॉ. अलग समितीची कार्यकक्षा
- मनुष्यबळ विकासासाठीचे बदल, सुधारणा सुचविणे.
- जुन्या अभ्यासक्रमात सुधारणा, नवीन अभ्यासक्रम याबाबत सुचना करणे.
- कृषी उत्पादकता वाढ, उत्पन्नवाढ आणि शेतकऱ्यांचे जिवनमान स्थिरावण्यासाठीचे उपाय सुचविणे.
- साधनसामग्री वापराचे मुल्यांकन करणे व विद्यापीठे स्वयंपूर्ण करण्यासाठीचे मार्ग, साधणांची शिफारस करणे.
- भविष्यातील गरज लक्षात घेवून विद्यापीठांची रचना, मनुष्यबळ, भरती प्रक्रीया, पायाभूत सोईसुविधा याबाबत सुधारणा सुचविणे.
- स्थानिक गरजेभिमुख अभ्यासक्रम, संशोधन, विस्तार, बिजोत्पादन, रोपे, कलमे इत्यादी बाबींचे पुनर्विलोकन करणे.
- शासकीय, अनुदानित, विना अनुदानित कृषी व संलग्न महाविद्यालये, कृषी तंत्रनिकेतन, कृषी तंत्र विद्यालयांचे मुल्यांकन करणे. त्यात केंद्रीय प्रवेश प्रणाली व विद्यार्थी मुल्यांकन पद्धतीचा अंतर्भाव करणे व शिक्षणाची गुणवत्ता सुधारणेसाठी सुचना करणे.
- संशोधन केंद्रांनी केलेल्या कार्याचे मुल्यांकन, सुरु असलेल्या संशोधनाचे परिक्षण करणे व सद्यस्थितीनुसार स्थानिक भाग केंद्रीत सुधारीत उद्दीष्टे ठरवणे. बाजारपेठ व बदलत्या हवामानाशी समन्वय साधून शिफारशी करणे.
- कृषी विद्यापीठांतील तंत्रज्ञान प्रसाराची गती वाढविण्यासाठी सुचना करणे.
------------------
कार्यकक्षेत समाविष्ठ नसलेल्या बाबी
- विद्यापीठांच्या विस्तार कार्याचे मुल्यांकन
- महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे मुल्यांकन
- महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ (माफसू)
- शिक्षण, संशोधन व प्रकल्पांचे इम्पॅक्‍ट ऍनालेसीस
------------------
फेरविचार कशासाठी ?
- विद्यापीठे स्थापन होतानाची स्थिती आणि आताची स्थिती यात मोठा फरक. यामुळे उद्दीष्टे, धेय्य धोरणात बदलांची गरज.
- गेल्या दहा वर्षात शेती व संलग्न क्षेत्रात मोठ्या प्रमाणात बदल, या बदलांच्या अनुषंगाने विद्यापीठांतही बदलांचा विचार.
- उथळ, कमी सुपीक जमीनीची कमी उत्पादकता, पावसाचा लहरीपणा, अन्नधान्य उत्पादन, बाजारपेठेत मोठे बदल.
- ग्राहकांच्या अन्न घेण्याच्या पद्धती आणि सवयींमध्ये अमुलाग्र बदल. नवीन पिके, उत्पादने, मुल्यवर्धीत अन्नपदार्थ वाढती मागणी.
- बदलांचा फायदा घेवून कृषी विकास दर आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढीसाठी धोरण व उपाययोजना ठरवणे.
------------------

No comments:

Post a Comment