Saturday, April 19, 2014

औरंगाबाद, उस्मानाबादमध्ये "ऍग्रोवन संवाद' चर्चासत्र


सकाळ - औरंगाबाद आवृत्तीसाठी
--------------
ऍग्रोवन वर्धापनदिनानिमित्त आयोजन

पुणे (प्रतिनिधी) ः दैनिक सकाळ ऍग्रोवनच्या 9 व्या वर्धापनदिनानिमित्त येत्या रविवारी (ता.20) औरंगाबाद व उस्मानाबादमध्ये अनुक्रमे आले व ऊस पिके आणि ठिबक सिंचन विषयक "ऍग्रोवन संवाद' चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. हे चर्चासत्र सर्वांसाठी मोफत खुले आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील चर्चासत्र कन्नड तालुक्‍यातील चिंचोली लिंबाजी येथिल धारेश्‍वर शिक्षण व कला वाणिज्य महाविद्यालयात सकाळी साडेनऊ वाजता सुरु होणार आहे. "आले पीक व्यवस्थापन व ठिबक सिंचनाचे महत्व' हा या चर्चासत्राचा विषय असून त्यात प्रगतिशिल शेतकरी दीपक चव्हाण आणि नेटाफीम इरिगेशन कंपनीचे कृषीतज्ज्ञ रमाकांत गोळे शेतकर्यांना मार्गदर्शन करणार आहेत.

उस्मानाबाद जिल्ह्यातील चर्चासत्र उमरगा येथिल महादेव मंदीराच्या सभागृहात सकाळी साडेनऊ वाजता सुरु होईल. "ऊस व्यवस्थापन व ठिबक सिंचनाचे महत्व' हा या चर्चासत्राचा विषय असून त्यात नॅचरल शुगरचे संचालक पांडुरंग आवाड व नेटाफिम इरिगेशन कंपनीचे कृषीतज्ज्ञ विजय आग्रे मार्गदर्शन करणार आहेत. शेतकर्यांना आपली पिके व सुक्ष्म सिंचन विषयक समस्यांवर थेट तज्ज्ञांशी संवाद साधून उपायही मिळविण्याची संधी या चर्चासत्रांतून उपलब्ध होणार आहे. सिद्धीविनायक एंटरप्रायजेस (नेटाफीम डिलर) हे या दोन्ही चर्चासत्रांचे प्रायोजक आहेत.

येत्या 20 एप्रिल रोजी दै. ऍग्रोवन 10 व्या वर्षात पदार्पन करत आहे. त्यानिमित्त राज्यात ठिकठिकाणी विविध विषयांवरील "ऍग्रोवन संवाद' चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. या चर्चासत्रांमध्ये शेतकर्यांना मान्यवर तज्ज्ञांकडून भाजीपाला, केळी, डाळींब, कापूस, द्राक्ष, आले, ऊस आदी पिकांचे उच्चांकी उत्पादन घेण्याची गुरुकिल्ली मिळविण्याची संधी उपलब्ध करुन देण्यात येत आहे. विभागातील अधिकाधिक शेतकरी व कृषी संबंधीत व्यक्तींनी या चर्चासत्रांचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांमार्फत करण्यात आले आहे.
--------(समाप्त)--------

No comments:

Post a Comment