Friday, April 18, 2014

ऍग्रोवन वर्धापनदिनानिमित्त "ऍग्रोवन संवाद' चर्चासत्रे

अॅग्रोवनसाठी
---------------
पुणे (प्रतिनिधी) ः दैनिक सकाळ ऍग्रोवनच्या 9 व्या वर्धापनदिनानिमित्त येत्या रविवारी (ता.20) राज्यात ठिकठिकाणी विविध जलव्यवस्थापन, पिकव्यवस्थापन, फलोत्पादन आदी विषयांवरील "ऍग्रोवन संवाद' चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. मान्यवर तज्ज्ञांकडून भाजीपाला, केळी, डाळींब, कापूस, द्राक्ष, आले, ऊस आदी पिकांचे उच्चांकी उत्पादन घेण्याची गुरुकिल्ली मिळविण्याची संधी या चर्चासत्रांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आपल्या भागातच उपलब्ध होणार आहे.

दीपक फर्टिलायझर्स, नेवासा आत्मा विभाग, डिस्केल वॉटर कन्डिशन, बीके एंटरप्रायजेस, ग्रीनलॅंन्ड प्रा.लि., निसर्ग फर्टिलायझर्स प्रा. लि. व सिद्धीविनायक एंटरप्रायजेस (नेटाफीम डिलर) हे या चर्चासत्रांचे प्रायोजक आहेत. ही सर्व चर्चासत्रे मोफत असून अधिकाधिक शेतकरी व कृषी संबंधीत व्यक्तींनी या चर्चासत्रांचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक व प्रायोजकांमार्फत करण्यात आले आहे.

चर्चासत्रांचे ठिकाणे, वेळ, विषय व वक्ते पुढीलप्रमाणे...
ठिकाण - विविध कार्यकारी सोसायटी हॉल, भाळवणी, ता. पारनेर, जि. नगर
वेळ - सकाळी 9
विषय - डाळिंब शेती नियोजन व खत व्यवस्थापन
वक्ते - प्रमोद देशमुख, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी

ठिकाण - तालुका फळरोप वाटिका कुकाणा (चिलेखनवाडी), ता. नेवासा, ता. जि. नगर
वेळ - सकाळी 9
विषय - डाळिंब उत्पादन तंत्रज्ञान
वक्ते - नंदकिशोर दहातोंडे, कृषी विज्ञान केंद्र नेवासा

ठिकाण - श्रीराम मंदीर, वेळोदे, ता. चोपडा, जि. जळगाव
वेळ - सकाळी 8.30
विषय - केळी लागवड व व्यवस्थापन
वक्ते - के. बी. देशमुख, केळी तज्ज्ञ

ठिकाण - जय योगेश्‍वर मंगल कार्यालय, कनाशी, ता. कळवण, जि. नाशिक
वेळ - सकाळी 10.30
विषय - मिरची व भाजीपाला उत्पादन तंत्र
वक्ते - प्रा. तुषार उगले, के.के.वाघ कृषी महाविद्यालय, नाशिक

ठिकाण - हनुमान मंदीर हॉल, शिरधाणे, ता. जि. धुळे
वेळ - सकाळी 9.30
विषय - कापूस पिकाची लागवड व व्यवस्थापन
वक्ते - डॉ. संजीव शामराव पाटील, तेलबिया संशोधन केंद्र, जळगाव

ठिकाण - भैरवनाथ सोसायटी हॉल, शेळगाव, ता. इंदापूर, जि. पुणे
वेळ - संतोष मधुकर खुरसाळे, जलतज्ज्ञ
विषय - क्षारयुक्त पाणी शेतीसाठी उपयुक्त करण्याचे तंत्रज्ञान
वक्ते - सकाळी 10

ठिकाण - शहाजीराव पाटील सभागृह, मोहोळ, सोलापूर
वेळ - सकाळी 10
विषय - मृद व जलसंधारणाचे महत्व व पीक नियोजन
वक्ते - प्रा. एस. के. उपाध्ये, विभागिय कृषी संशोधन केंद्र, सोलापूर

ठिकाण - प्रकाश कुलकर्णी यांचा मळा, दिगवडे, ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर
वेळ - सकाळी 10
विषय - एकरी 100 टन उत्पादन व सेंद्रीय शेतीचे महत्व
वक्ते - डॉ. डी. एम. वीर, प्रादेशिक ऊस व गुळ संशोधन केंद्र, कोल्हापूर

ठिकाण - गणेश मंदीर हॉल, राजापूर, ता. तासगाव, जि. सांगली
वेळ - सायंकाळी 5.30
विषय - द्राक्ष एप्रिल छाटणी नियोजन
वक्ते - एस.टी.शिंदे, द्राक्षतज्ज्ञ

ठिकाण - धारेश्‍वर शिक्षण व कला वाणिज्य महाविद्यालय, चिंचोली लिंबाजी,ता. कन्नड, जि. औरंगाबाद
वेळ - सकाळी 9.30
विषय - आले पीक व्यवस्थापन व ठिबक सिंचनाचे महत्व
वक्ते - दीपक चव्हाण, प्रगतशिल शेतकरी व रमाकांत गोळे, कृषीतज्ज्ञ, नेटाफीम

ठिकाण - महादेव मंदीर सभागृह, महादेव गल्ली, उमरगा, जि. उस्मानाबाद
वेळ - सकाळी 9.30
विषय - ऊस व्यवस्थापन व ठिबक सिंचनाचे महत्व
वक्ते - पांडुरंग आवाड, संचालक नॅचरल शुगर व विजय आग्रे, कृषीतज्ज्ञ, नेटाफीम

ठिकाण - मातोश्री कौसल्याबाई सोमकुंवर सभागृह, पारडसिंगा, ता. काटोल, जि. नागपूर
वेळ - सकाळी 11
विषय - कपाशी पिकाचे व्यवस्थापन
वक्ते - डॉ. सौ. विनिता गोटमारे, शास्त्रज्ञ, सीआयसीआर, नागपूर.
--------(समाप्त)--------


No comments:

Post a Comment