पुणे (प्रतिनिधी) ः कोकण गोव्यात काही ठिकाणी तर
मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान
खात्याच्या पुणे वेधशाळेने व्यक्त केला आहे. यापैकी अनेक ठिकाणी दुपारनंतर किंवा
सध्याकाळी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. आकाश अंशतः ढगाळलेले राहण्याचा अंदाज
आहे.
हवामान खात्याच्या नोंदीनुसार शनिवारी (ता.27) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या चोविस तासात कोकण गोव्यात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. मराठवाडा व विदर्भात हवामान कोरडे होते. कोकणात कुडाळ येथे 40 मिलीमिटर, कणकवली येथे 30 मिलीमिटर, वेगुर्ला, लांजा, रोहा येथे प्रत्येकी 20 मिलीमिटर तर सावंतवाडी, अलिबाग, राजापूर, मालवण, पणजी येथे प्रत्येकी 10 मिलीमिटर पाऊस झाला. मध्य महाराष्ट्रात पेठ येथेही 10 मिलीमिटर पावसाची नोंद झाली. मराठवाडा व विदर्भात कोठेही पावसाची नोंद झाली नाही.
दरम्यान, शनिवारी सकाळपर्यंत नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या (मॉन्सून) माघारीच्या वाटचालीत काहीही प्रगती झाली नाही. पुढील तिन दिवसात वायव्य व उत्तर भारतातील आणखी काही भागातून मॉन्सून माघारी फिरण्यास अनुकूल स्थिती असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. शनिवारी सकाळपर्यंत आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश आणि किनारी व दक्षिण कर्नाटकमध्ये मॉन्सून सक्रीय होता.
---------(समाप्त)-----------
हवामान खात्याच्या नोंदीनुसार शनिवारी (ता.27) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या चोविस तासात कोकण गोव्यात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. मराठवाडा व विदर्भात हवामान कोरडे होते. कोकणात कुडाळ येथे 40 मिलीमिटर, कणकवली येथे 30 मिलीमिटर, वेगुर्ला, लांजा, रोहा येथे प्रत्येकी 20 मिलीमिटर तर सावंतवाडी, अलिबाग, राजापूर, मालवण, पणजी येथे प्रत्येकी 10 मिलीमिटर पाऊस झाला. मध्य महाराष्ट्रात पेठ येथेही 10 मिलीमिटर पावसाची नोंद झाली. मराठवाडा व विदर्भात कोठेही पावसाची नोंद झाली नाही.
दरम्यान, शनिवारी सकाळपर्यंत नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या (मॉन्सून) माघारीच्या वाटचालीत काहीही प्रगती झाली नाही. पुढील तिन दिवसात वायव्य व उत्तर भारतातील आणखी काही भागातून मॉन्सून माघारी फिरण्यास अनुकूल स्थिती असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. शनिवारी सकाळपर्यंत आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश आणि किनारी व दक्षिण कर्नाटकमध्ये मॉन्सून सक्रीय होता.
---------(समाप्त)-----------
No comments:
Post a Comment