Tuesday, September 16, 2014

इंदिरा गांधी, संजय गांधीच्या दोन हजार पदांना मुदतवाढ

पुणे (प्रतिनिधी) ः जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत राबविण्यात येत असलेल्या इंदिरा गांधी निराधार भूमिहीन शेतमजून महिला अनुदान योजना व संजय गांधी योजना व इतर विशेष सहाय्य योजनेच्या दोन हजार सहा पदांना राज्य शासनामार्फत 28 फेब्रुवारी 2015 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

इंदिरा गांधी भूमिहीन वृद्ध शेतमजूर सहाय्य योजनेतील 294 अव्वल कारकुन, 290 लिपीक-टंकलेखक, संजय गांधी योजनेतील 1 उपजिल्हाधिकारी, 40 तहसिलदार, 240 नायब तहसिलदार, 29 उपलेखापाल, 314 अव्वल कारकून, 385 लिपीक - टंकलेखक, 46 तलाठी व 367 शिपाई यांचा मुतवाढ देण्यात आलेल्यांमध्ये समावेश आहे.

मुदतवाढ देण्यात आलेले जिल्हानिहाय एकूण कर्मचारी ः मुंबई शहर 27, मुंबई उपनगर 29, ठाणे 94, रायगड 70, रत्नागिरी 48, सिंधुदुर्ग 36, नाशिक 95, धुळे 32, जळगाव 92, नगर 82, नंदुरबार 43, पुणे 105, सोलापूर 66, सातारा 65, सांगली 57, कोल्हापूर 76, नागपूर 97, वर्धा 43, चंद्रपूर 68, भंडारा 29, गडचिरोली 65, गोंदिया 46, अमरावती 101, अकोला 49, यवतमाळ 91, बुलडाणा 81, वाशिम 26, औरंगाबाद 51, बीड 38, नांदेड 48, परभणी 30, उस्मानाबाद 39, जालना 35, लातूर 37, हिंगोली 15.
-------------------- 

No comments:

Post a Comment