Tuesday, September 30, 2014

पळापळी ग्रॅन्युल्स


पुणे ः वन्य प्राणी, उंदीर, घुशी आदींपासून होणारे पिकांचे नुकसान टाळण्यासाठी सोलापूर येथिल "मनिषा ऍग्रो सायन्सेस' कंपनीमार्फत पळापळी हे अभिनव पद्धतीचे दाणेदार स्वरुपाचे (ग्रॅन्युल्स) उत्पादन बाजारात आणले आहे. पिक क्षेत्रा भोवती पाच फुटाच्या पट्ट्यात हे ग्रॅन्युअल्स टाकल्यानंतर नासधुस करणारे प्राणी 15 ते 20 दिवस पिकात प्रवेश करत नाहीत, असा दावा कंपनीमार्फत करण्यात आला आहे.

शेताच्या बांधापासून पाच फुट रुंदीच्या पट्ट्यामध्ये कांदा बी टाकल्याप्रमाणे पळापळी ग्रॅन्युल्स एकरी पाच किलो प्रमाणात टाकल्यास उपद्रवी प्राण्यांचा शेतात प्रवेश करतेवेळी ग्रॅन्युल्सशी संपर्क येतो. यावेळी ग्रॅन्युल्सचा उग्र स्वरुपाचा वास व त्यातून जमिनीपासून सहा ते आठ इंचापर्यंत धग येते. ही धग प्राण्याच्या डोळ्यात जावून तीव्र स्वरुपाची जळजळ होते. चारही बाजूने कोणतेही अंतर, फट न ठेवता ग्रॅन्युल्स टाकल्यास उपद्रवी प्राण्यांचा अटकाव होतो. श्‍वसनावाटे जाणारा उग्र वास व डोळ्यांची जळजळ यामुळे उपद्रवी प्राणी शेतापासून लांब पळतात. तरी, शेतकरी बांधवांनी या ग्रॅन्युल्सचा वापर करुन पिकांची नासाडी टाळावी, असे आवाहन कंपनीमार्फत करण्यात आले आहे.
-------

No comments:

Post a Comment