Tuesday, March 17, 2015

आर्थिक पहाणी अहवाल ः 2014-15

- विजेची स्थापित क्षमता 31 डिसेंबर 2014 रोजी 30 हजार 917 मेगावॅट होती. डिसेंबर 2014 अखेर 78 हजार 488 दशलक्ष यनिट्‌स इतकी वीज निर्मिती झाली असून मागील वर्षाच्या तत्सम कालावधीपेक्षा 18.1 टक्केनी अधिक होती. अक्षय उर्जेची स्थापित क्षमता 6613 मेगावॅट होती. व त्याद्वारे डिसेंबर 2014 अखेरपर्यंत पाच हजार 207 दशलक्ष मॅगावॅट विजनिर्मिती झाली. सन 2013-14 मध्ये महापारेषन कंपनीची पारेषण हानी, महावितरण कंपनीची वितरण हानी आणि एकत्रित तांत्रिक व व्यवसायिक हानी अनुक्रमे 4.8 टक्के, 14 टक्के व 17.76 टक्के होती.

- ऑगस्ट 1991 ते ऑक्‍टोबर 2014 या कालावधीत राज्यात रुपये 10 लाख 63 हजार 342 कोटी प्रस्तावित गुंतवणुकीच्या 18 हजार 709 औद्योगिक प्रकल्पांना मान्यता देण्यात आली. त्यापैकी 2 लाख 54 हजार 784 कोटी रुपये (23.9 टक्के) प्रस्तावित गुंतवणूकीचे 8 हजार 376 प्रकल्प (44.8 टक्के) कार्यान्वित झाले.

- राज्यात डिसेंबर 2014 अखेर 50 हजार 637 कोटी रुपये गुंतवणूकीचे व 26.9 लाख रोजगार असलेले सुमारे 2.12 लाख सुक्ष्म, लघू व मध्यम उपक्रम कार्यरत होते.

- सन 2014 मध्ये राज्यात सरासरीच्या 70.2 टक्के पाऊस पडला. राज्यातील एकूण 355 तालुक्‍यांपैकी (मुंबई शहर व उपनगर जिल्ह्यातील तालुके वगळून) 226 तालुक्‍यांत अपुरा, 112 तालुक्‍यांत साधारण तर 17 तालुक्‍यांत सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडला.

- सन 2014 च्या खरिप हंगामामध्ये एक कोटी 45 लाख 79 हजार हेक्‍टर क्षेत्रावर पेरणी पूर्ण करण्यात आली. ती मागील वर्षाच्या तुलनेत (1 कोटी 50 लाख 56 हजार हेक्‍टर) तीन टक्‍क्‍यांनी कमी आहे. मागील वर्षाच्या तुलनेत तृणधान्यांच्या व कडधान्यांच्या पिकांखालील क्षेत्रात घट झाली तर तेलबियांखालील तसेच उसाखालील क्षेत्रात किंचित वाढ झाली. मागील वर्षाच्या तुलनेत तृणधान्ये, कडधान्ये, तेलबिया व कापूस यांच्या उत्पादनात घट तर ऊस उत्पादनात किंचित वाढ अपेक्षित आहे.

- सन 2014 च्या खरीप हंगामातील असमाधानकारक पावसामुळे रब्बी हंगामातील क्षेत्रात मागील वर्षाच्या तुलनेत 27 टक्के घट अपेक्षित आहे. तृणधान्ये, कडधान्ये व तेलबिया पिकांखालील क्षेत्र तसेच उत्पादनात मागील वर्षाच्या तुलनेत घट अपेक्षित आहे.

- द्वितिय पूूर्वानुमानानुसार 2014-15 मध्ये मागील वर्षाच्या तुलनेत ऊस वगळता सर्व प्रमुख पिकांच्या उत्पादनात घट अपेक्षित आहे. ही घट प्रामुख्याने राज्याच्या सर्व भागात पेरणीच्या कालावधीत तसेच खरीप पिकांच्या वाढीदरम्यान झालेल्या अत्यंत अपुऱ्या पावसामुळे झाली आहे.

- सन 2013-14 मध्ये वाणिज्यिक बॅंकांकडून 16 हजार 462 कोटी रुपये, प्रादेशिक ग्रामीण बॅंकांकडून एक हजार 611 कोटी रुपये आणि महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंक, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंका व भूविकास बॅंका यांच्याकडून एकत्रित 13 हजार 354 कोटी रुपये रकमेच्या पिक कर्जाचे वाटप करण्यात आले. तसेच या सर्व बॅंकांनी आठ हजार 257 कोटी रुपये रकमेच्या कृषी मुदत कर्जाचे वाटप केले. सन 2013-14 मध्ये प्राथमिक कृषी सहकारी पतपुरवठा संस्थांकडून शेतकऱ्यांना आठ हजार 567 कोटी रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले. यापैकी चार हजार 279 कोटी रुपयांचे कर्ज अल्प भूधारक व सिमांतिक शेतकऱ्यांना देण्यात आले.

- शासकीय व सहकारी दुग्धसंस्थांद्वारे 2014-15 मध्ये डिसेंबर अखेर दैनिक सरासरी दूध संकलन 43.3 लाख लिटर होते. तर 2013-14 मध्ये ते 39.2 लाख लिटर होते. सन 2013-14 मध्ये दुधाचे एकूण उत्पादन 91 लाख मे. टन होते.

- सागरी व गोड्या पाण्यातील अंदाजित मत्स्य उत्पादन सन 2014-15 मध्ये सप्टेंबर पर्यंत अनुक्रमे 1.22 लाख मे. टन व 0.83 लाख मे. टन होते. तर 2013-14 मध्ये ते अनुक्रमे 4.67 लाख मे. टन व 1.35 लाख मे.टन होते.

- मार्च 2014 अखेर सुमारे 509 लाख सभासद असलेल्या 2.30 लाख सहकारी संस्था कार्यरत होत्या. त्यापैकी नऊ टक्के कृषी पतपुरवठा, 10 टक्के बिगर कृषी पतपुरवठा तर 81 टक्के इतर संस्था होत्या. एकूण सहकारी संस्थांपैकी 24 टक्के सहकारी संस्था तोट्यात होत्या. व त्यापैकी 20.7 टक्के संस्था कृषी पतपुरवठ्याशी संबंधित होत्या.

- महाराष्ट्र मानव विकास अहवाल 2012 नुसार राज्याचा मानव विकास निर्देशांक 0.752 आहे. बृहन्मुंबईचा मानव विकास निर्देशांक सर्वाधिक 0.841 तर नंदुरबारचा सर्वात कमी 0.604 आहे. राज्यातील एकूण जिल्ह्यांपैकी 27 जिल्ह्यांचा निर्देशांक राज्याच्या मानव विकास निर्देशांकापेक्षा कमी आहे.

- दि. 31 मार्च 2014 रोजी 6.9 लाख स्व-सहाय्यता गटांची एकूण बचत 748.1 कोटी रुपये होती. सुमारे दोन लाख स्व-सहाय्यता गटांकडे एकूण 1320.3 कोटी कर्ज थकित होते.

- प्रधानमंत्री जन धन योजना देशातील सर्व कुटुंबांना वित्तीय समावेशात आणणारे राष्ट्रीय अभियान असून ते 28 ऑगस्ट 2014 रोजी सुरु करण्यात आले. जानेवारी 2015 अखेर राज्यात सुमारे 87 लाख बॅंक खाती उघडण्यात आली.

- राज्य शासनाची महसूली जमा सन 2013-14 (सुधारीत अंदाज) मध्ये एक लाख 58 हजार 410 कोटी रुपये होती. तर सन 2014-15 (अर्थसंकल्पीय अंदाज) मध्ये ती एक लाख 80 हजार 320 कोटी रुपये अपेक्षित आहे. सन 2014-15 (अर्थसंकल्पीय अंदाज) मध्ये कर महसूल आणि करेतर महसूल अनुक्रमे एक लाख 38 हजार 853 कोटी रुपये व 41 हजार 467 कोटी रुपये अपेक्षित आहे. एप्रिल ते डिसेंबर 2014 या कालावधीत प्रत्यक्ष महसुली जमा एक लाख 14 हजार 693 कोटी रुपये (अर्थसंकल्पीय अंदाजाच्या 63.6 टक्के) होती.

- राज्य शासनाचा सन 2014-15 (अर्थसंकल्पीय अंदाज) मधील महसूली खर्च एक लाख 84 हजार 423 कोटी रुपये अपेक्षित असून तो 2013-14 (सुधारीत अंदाज) मध्ये एक लाख 61 हजार 427 कोटी रुपये आहे.

- मार्च 2014 अखेर सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा परिषदांच्या देशभालीखालील रस्त्यांची लांबी सुमारे 2.64 लाख किलोमिटर होती. सुमारे 99 टक्के पेक्षा जास्त गावे बारमाही व हंगामी रस्त्यांनी जोडलेली होती. तर 250 गावे कोणत्याही रस्त्यांनी जोडलेली नव्हती.
-----------------------------






No comments:

Post a Comment