Sunday, March 22, 2015

मन की बात - रघुनाथ शिंदे

भुमिका, कामकाज पद्धत चुकीची

पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकऱ्यांविषयी ज्या भावना बोलतात ते प्रत्यक्षात आणताना ते कसुर करतात. त्यांची शेतकरीविषयक भुमिका योग्य नाही. मुळात जमीनी विकत घेणे चुकीचे आहे. उद्योगांनी काही वर्षांच्या कराराने जमीनी भाड्याने घ्याव्यात. त्यामुळे उद्योगांचेही भले होईल व शेतकरीही देशोधडीला लागणार नाही. महाराष्ट्रातील पाच हजार गावे यंदा जलयुक्त होणार असल्याचे मोदी म्हणाले. पण प्रत्यक्षात ही अभियाने ठेकेदार, कंत्राटदारांची घरे भरण्यासाठी चालवली जात आहेत की काय अशी स्थिती आहे.

आमच्या खैरेनगर गावात कोरडवाहू अभियान, पाणलोट विकास, जलयुक्त शिवार अशी अनेक अभियाने एकाच वेळी राबविण्यात येत आहे. तरीही गाव जलयुक्त होणार नाही. तीन वर्षांपासून ठिबक सिंचनाचे अनुदान मिळालेले नाही. सरकारने शेतकऱ्यांविषयीची भुमिका आणि कामकाजाची पद्धत अमुलाग्र सुधारणे आवश्‍यक आहे.
- रघुनाथ शिंदे, प्रगतशिल शेतकरी, खैरेनगर, ता. शिरुर, जि. पुणे.
------------

No comments:

Post a Comment