Wednesday, March 25, 2015

एमएस्सी एन्ट्रन्स २५ जूनपासून

कृषी पदव्युत्तरची
प्रवेश परिक्षा 25 जूनपासून

अर्जाची अंतिम मुदत 20 एप्रिल

पुणे (प्रतिनिधी) ः राज्यातील चारही कृषी विद्यापीठांतील विविध विद्याशाखांच्या येत्या शैक्षणिक वर्षासाठीच्या (2015-16) पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या सामाईक प्रवेश परिक्षेची प्रक्रीया महाराष्ट्र कृषी विद्यापीठे परिक्षा मंडळामार्फत नुकतीच सुरु झाली आहे. प्रवेश परिक्षेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम मुदत 20 एप्रिल 2015 ही आहे. प्रवेश परिक्षा 25 ते 30 जून या कालावधीत राज्यातील 14 केंद्रांवर होणार आहे. परिक्षेचा निकाल 17 जुलैला महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध होणार आहे.

या प्रवेश परिक्षेसाठी कृषी व संबंधित विद्याशाखांचे पदवीधर आणि चालू शैक्षणिक वर्षाच्या अंतिम पदवी परिक्षेस बसणारे विद्यार्थी पात्र आहेत. विद्यार्थ्यांना कृषी परिषदेच्या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज केल्यानंतर मिळणाऱ्या चलनाद्वारे परिक्षा शुल्काची रक्कम बॅंकेत भरावी लागेल. परिक्षा शुल्क दिनांक 23 एप्रिल 2015 पर्यंत स्विकारले जाईल. संभाव्य पात्र व अपात्र उमेदवारांची यादी 5 मे रोजी तर पात्र उमेदवारांचे प्रवेश पत्र 5 जून रोजी संकेतस्थळावर उपलब्ध होईल. उमेदवारांनी या प्रवेशपत्राची प्रत घेवून परिक्षा केंद्रावर उपस्थित रहावे. परिक्षेचा निकाल व उत्तराची नमुना पत्रिका 17 जुलै 2015 रोजी कृषी परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
विद्यार्थ्यांनी अधिक माहितीसाठी कृषी परिषदेच्या www.mcaer.org या संकेतस्थळास भेट द्यावी किंवा 020 25510419 या क्रमांकावर परिक्षा मंडळाशी संपर्क साधावा, असे आवाहन महाराष्ट्र कृषी विद्यापीठे परिक्षा मंडळाचे नियंत्रक डॉ. आर. के. रहाणे यांनी केले आहे.
------------ 

No comments:

Post a Comment