नारायणगाव, जि. पुणे ः येथिल कृषी
तंत्र निकेतन (ऍग्री पॉलिटेक्नीक) अभ्यासक्रमाचा वार्षिक पारितोषिक वितरण व तृतीय
वर्षाच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ नुकताच पार पडला. वरिष्ठ पत्रकार मंदार
फणसे, ग्रामोन्नती मंडळाचे मंडळाचे विश्वस्त डॉ. विध्वंस, नंदाताई डांगे, अध्यक्ष
प्रकाशशेठ पाटे, कार्याध्यक्ष अनिलतात्या मेहेर, कार्यवाह रविंद्र पारगावकर,
सहकार्यवाह अरविंद मेहरे, कृषी संकुल व्यवस्थापक बी. आर. भुजबळ आदी मान्यवर यावेळी
उपस्थित होते. महाराष्ट्रातील शेती, शेतकरी आणि प्रसारमाध्यमांची भुमिका या
विषयावरील चर्चासत्र यावेळी पार पडले. प्राचार्य राधाकृष्ण गायकवाड यांनी
सुत्रसंचालन केले. रविंद्र पारगावकर यांनी आभार मानले.
----------
----------
No comments:
Post a Comment