Friday, March 27, 2015

कृषी पुरस्कारप्राप्त शेतकरी विचार मंच स्थापना


पुणे (प्रतिनिधी) ः कृषी विभागामार्फत विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आलेल्या व्यक्तींसाठीच्या "कृषी पुरस्कार प्राप्त शेतकरी विचार मंच, महाराष्ट्र' या संस्थेची स्थापना नुकतीच झाली. संस्थेचे अध्यक्ष आनंद कोठडिया यांच्या अध्यक्षतेखाली मंचाची पहिली बैठक पुण्यात नुकतीच झाली. यावेळी संस्थेची राज्यस्तरीय कार्यकारणी मंजूर करण्यात आली. धर्मादाय नोंदणी विधिनियमानुसार संस्थेची नोंदणी करण्यात येणार असल्याचे श्री. कोठडिया यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

नवनियुक्त कार्यकारणी पुढीलप्रमाणे ः आनंद कोठडिया (अध्यक्ष), दिलीप काळमेघ, दिपक आसेगावकर, अरुण देवरे, उद्धव खेडेकर, डॉ. शिवाजी शिंदे, चंद्रशेखर भडसावळे, नामदेव माळी, संजय माने (उपाध्यक्ष व विभागिय अध्यक्ष), उदय बापट (कार्यवाह), अनिल मेहेर, बी. बी. ठोंबरे, श्रीमती वसुधा सरदार, रणजीत खानवीलकर, रावसाहेब पुजारी, शशिकांत पिसाळ, के. बी. पाटील, पोपटराव पवार, कांतराव देशमुख, परमेश्‍वर राऊत (सदस्य)
------------- 

No comments:

Post a Comment